मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिला. दरम्यान, पोलिसांनी अबंड सह संपुर्ण जालना आणि बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. यावरून आता राज्यातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा…दोन दिवसापुर्वी ठाकरे गटावर गंभीर आरोप, अन् आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ‘या’ महिला नेत्याची जोरदार चर्चा
अशी भाषा मराठा समाजाला मान्य नाही. जे बोलतात त्यामागे स्क्रिप्ट कोणाची आहे ? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात आरक्षण गेले त्यावेळी तुम्ही गप्प का बसता ? शरद पवार इतकी वर्षे आरक्षण देऊ शकले नाही. त्यावेळी गप्प का बसला ? असा सवाल आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये त्यावेळी काय चर्चा झाली, ‘ती’ समोर आणा,” विरोधकांची मोठी मागणी
दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासला आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असे सांगत कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसी आरक्षणाला धक्का लावला. महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे ? हे सरकारला स्पष्ट करावे लागेल आणि हिमंत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली ? ते जाहीर करावं, असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार”, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना डिवचलं
हेही वाचा“राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी फडणवीसांनी फुंकली,” राऊतांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करून फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…“गोर गरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक ” गणपत गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाडांना रूग्णालयातून डिस्चार्ज
हेही वाचा…“बारामतीतून सुनेत्रा पवार दीड लाखांनी विजयी होतील,” भाजपच्या ‘या’ माजी खासदाराने वर्तवला अंदाज
हेही वाचा…“उपोषण मागे घेण्याची जरांगे पाटलांची मोठी घोषणा, फडणवीसांवर चढवला पुन्हा हल्ला,” म्हणाले…