जालना : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. काल जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज पुन्हा उपोषण मागे घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची राळ उठवली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा अंतरवाली सराटीसारखी दंगल घडवायची होती. परंतु आम्ही त्यांचा डाव हाणून पाडला असल्याचे जरांगेंनी म्हटलं.तर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी सारळी उपोषण सुरूच राहणार. दोन दिवसात चर्चा करून पुढची दिशा ठरवणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…जरांगेंच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
काल पाच हजार महिला गोळ्या झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा अंतरवाली सराटीसारखी दंगल घडवायची होती. पंरतु माझी जनता माझ्यासोबत आहे. असं वाटलं असतं तर त्यांनी महिलांवरिल गुन्हे मागे घेतलं असतं. तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलं नाही. राज्यात पुन्हा एकदा दंगल झाली पाहिजे. असं देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं. राज्य बेचिराख झालं असतं. पण आम्ही घडू दिलं नाही. तुम्ही बंगल्यात लपून बसला असता पण राज्य जळालं असतं. असेही जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा…“एकनाथ खडसे यांनी भाजपात यावं असं मी आवाहन केलंच नाही,” रक्षा खडसेंचं घुमजाव
दरम्यान, यातच उपोषण मागे घेतल्यानंतर डॉंक्टरांच्या सल्ल्यानुसार जरांगे पाटील उपचार घेणार आहेत. उपचार कुठे आणि डॉक्टर कोण असणार ? ते आम्हीच ठरवू. असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तयारीला लागा. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…दोन दिवसापुर्वी ठाकरे गटावर गंभीर आरोप, अन् आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ‘या’ महिला नेत्याची जोरदार चर्चा
हेही वाचा…“जरांगे पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये त्यावेळी काय चर्चा झाली, ‘ती’ समोर आणा,” विरोधकांची मोठी मागणी
हेही वाचा…ना विलास लांडे, ना आढळराव पाटील..! अजित पवारांच्या ‘या’ एकेकाळच्या कट्टर समर्थकावर महायुती लावणार डाव ?
हेही वाचा….“करेक्ट कार्यक्रम तुमचा नाही तर तुमच्या पाठीमागे..”अजय महाराजांचे पुन्हा गौप्यस्फोट, जरांगेंवर हल्लाबोल
हेही वाचा…मनोज जरांगेंच्या बोलण्यातून राजकीय वास, मंत्र्यांचा गंभीर आरोप