मुंबई : मराठा समाजातील ज्या व्यक्तींच कुणबी अशी निजामकालीन नोंद असेल त्यांना इतर मागास प्रवर्गातील दाखले दिले जातील. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. तर मराठा समाजातील सर्वच व्यक्तींना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर उपोषण मागे घेणार अशी भूमिका मनोर जरांगे पाटलांनी घेतली आहे. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…नांदेडमधील काॅंग्रेसचा मोठा नेता शिवसेनेत, अशोक चव्हाणांना बसला मोठा धक्का
जुन्या बाटलीवर नवीन लेबल लावून मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे का ? आधी देखील वंशावळी दाखवून तीन पिढ्यांचा दाखला दिला की कोणत्याही समाजाचे प्रमाणपत्र मिळत होते. मग आता ट्रिपल इंजिन सरकारने काय नवीन घोषणा केली ? असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
हेही वाचा…“शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी वातावरण तयार केलं जातंय”, वकील असीम सरोदे यांचा दावा
दरम्यान, मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी काल मराठा समाजसंदर्भात निर्णय घेतले. माझ्याकडे काल अर्जून खोतकर, राजेश टोपे आणि नंतर रावसाहेब दानवे आले होते. ज्या मराठा समाजाकडे कुणबीची नोंद आहे. त्यांना आजपासून त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे. पण आमचं म्हणणं आहे, एकच सुधारणा करा. आमच्याकडे वंशावळीचे प्रमाण पत्र नाहीत. त्यामुळे वंशावळी शब्द काढा अन् सरसकट प्रमाण पत्र मिळेल, असं म्हणा, मी उपोषण मागे घेतो असं जरांगे पाटील म्हणाले.
जुन्या बाटलीवर नवीन लेबल लावून मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे का?
आधी देखील वंशावळी दाखवून तीन पिढ्यांचा दाखला दिला की कोणत्याही समाजाचे प्रमाणपत्र मिळत होते.
मग आता ट्रीपल इंजिन सरकारने काय नवीन घोषणा केली? pic.twitter.com/PeXZUC2mrB— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर..,” रोहित पवारांचा नरेंद्र मोदींवर घणाघात
हेही वाचा…“..तर मी उपोषण मागे घेतो, निर्णय मान्य,पण…,” जरांगे पाटलांनी सरकारकडे घातली ‘ही’ अट
हेही वाचा…मोठी बातमी…! देशात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा नोटबंदी करणार ?
हेही वाचा…“खरंतर हे नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर..,” सोमय्या प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल
हेही वाचा…“एका व्यक्तीने सरकारला जेरीस आणले, मनोज जरांगे पाटील गुंडाळले जाऊ शकत नाही”