नवी दिल्ली : केंद्र सरकाराने येत्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यातच इंडिया नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याची तयारी केंद्र सरकारने केली असल्याची चर्चा रंगली आहे. यावरून आता देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी वातावरण तयार केलं जातंय”, वकील असीम सरोदे यांचा दावा
नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं. देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे आणि देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत असल्याची टिका रोहित पवारांनी केंद्र सरकारवर केली आहे.
हेही वाचा…रिक्षा डंपर भरून माझ्याकडे पुरावे, सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं, जरांगे पाटलांचं विधान
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावं, हे आता जनतेनेच ठरवायला हवं. मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्यांवरच चर्चा करायला हवी असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं.
देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“..तर मी उपोषण मागे घेतो, निर्णय मान्य,पण…,” जरांगे पाटलांनी सरकारकडे घातली ‘ही’ अट
हेही वाचा…मोठी बातमी…! देशात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा नोटबंदी करणार ?
हेही वाचा…“खरंतर हे नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर..,” सोमय्या प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल
हेही वाचा…“एका व्यक्तीने सरकारला जेरीस आणले, मनोज जरांगे पाटील गुंडाळले जाऊ शकत नाही”
हेही वाचा…नांदेडमधील काॅंग्रेसचा मोठा नेता शिवसेनेत, अशोक चव्हाणांना बसला मोठा धक्का