नवी दिल्ली : केंद्र सरकाराने येत्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यातच इंडिया नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याची तयारी केंद्र सरकारने केली असल्याची चर्चा रंगली आहे. यावरून आता देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…“चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल, पण जनरल डायरचं काय?” आदित्य ठाकरेंचा सवाल
भारतीय चलनावर असलेले रिजर्व बॅंक ऑफ इंडिया बदलण्यासाठी मोदी सरकार पुन्हा नोटबंदी करणार ? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच चलनावरील इंडिया नाव बदलून भारत हेच नाही तोपर्यंत वीरेंद्र सेहवाग, अमिताभ बच्चन यांसारखे सेलिब्रिटी सध्या चलनात असलेल्या नोटी स्वीकारणार नाही का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
हेही वाचा…काहीही करून मुख्यमंत्र्यांच्या मुलाला घरी बसवायचंय, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना, मोठी रणनीति तयार
दरम्यान, ‘इंडिया’ नाव बदलून ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यावर विरेंद्र सेहवाग, अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर राज्यातून भाजपच्या नेत्यांनी भारत नावाच्या बाजूने तर विरोधकांनी इंडियाच्या बाजूने प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
पुन्हा नोटबंदी ?
भारतीय चलनावर असलेले “रिजर्व बँक ऑफ इंडिया” बदलण्यासाठी मोदी सरकार पुन्हा नोटबंदी करणार?
चलनावरील इंडिया नाव बदलून भारत होत नाही तो पर्यंत वीरेंद्र सेहवाग,अमिताभ बच्चन यांसारखे सेलिब्रिटी सध्या चलनात असलेल्या नोटा स्वीकारणार नाही का ?
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“खरंतर हे नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर..,” सोमय्या प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल
हेही वाचा…“एका व्यक्तीने सरकारला जेरीस आणले, मनोज जरांगे पाटील गुंडाळले जाऊ शकत नाही”
हेही वाचा…नांदेडमधील काॅंग्रेसचा मोठा नेता शिवसेनेत, अशोक चव्हाणांना बसला मोठा धक्का
हेही वाचा…“शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी वातावरण तयार केलं जातंय”, वकील असीम सरोदे यांचा दावा
हेही वाचा…रिक्षा डंपर भरून माझ्याकडे पुरावे, सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं, जरांगे पाटलांचं विधान