मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रांची चाचपणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती स्थापन केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारचं शिष्टमंडळ आमच्या भेटीला येईल ही अपेक्षा आम्ही सोडून दिली असल्याचं उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण ? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
एका दिवसात अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आम्ही देतो. सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं. हैदराबादपासूनचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. रिक्षा डंपर भरून पुरावे माझ्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला होता. त्यात कॅबिनेट बैठकही झाली. सरकारचा वेळ वाचवण्यासाठी एका दिवसात पुरावे देऊ. राज्यपालांचा परवानगी घेऊन सरकारने अध्यादेश काढावा. आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठीही तज्ज्ञ देण्याची तयारी असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“आता पंतप्रधानांना संबोधित करताना प्राईम मिनिस्टर ऑफ बीजेपी असं म्हणायचं का ?” बड्या खासदाराचा सवाल
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली आहे. त्यांना आज डॉक्टरांनी सलाईन लावली होती. त्यामुळे मराठा आरक्षण दिवसेंदिवस आता तापत चाललं आहे. तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या संवेदनशील मुद्दयावर कोणतंही विधान करू नये असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल, पण जनरल डायरचं काय?” आदित्य ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…काहीही करून मुख्यमंत्र्यांच्या मुलाला घरी बसवायचंय, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना, मोठी रणनीति तयार
हेही वाचा…“जालन्यात मुख्यमंत्र्यांनी उपोषण करायला सांगितले, तर लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिलेत”
हेही वाचा…सभागृहात पेन ड्राईव्ह दिला, ‘त्या’ प्रकरणात संपादकांवर गुन्हा दाखल, पण सोमय्यांवर का नाही ?
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी खूशखबर.., कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत