मुंबई : जालना येथे मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सांगलीत उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने आज सांगली बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज सांगली ग्रामीण जिल्हा आणि सांगली शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. तर करमाळा शहर बंद ठेवत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमूख मागणी यावेळी करण्यात आली आहे.
हेही वाचा…“जालन्यात मुख्यमंत्र्यांनी उपोषण करायला सांगितले, तर लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिलेत”
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे गावात मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टामंडळ दाखल झालं होतं. त्यावरून गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांचे आंदोलन गुंडाळले होते. परंतु मनोज जरांगे यांना गुंडाळले जाऊ शकत नाही. जरांगे हे गुंडाळले जाणारे व्यक्ती नाही, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
हेही वाचा…सभागृहात पेन ड्राईव्ह दिला, ‘त्या’ प्रकरणात संपादकांवर गुन्हा दाखल, पण सोमय्यांवर का नाही ?
मराठा समाज आणि ओबीसी समाज सध्या अस्वस्थ आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. एका साध्या व्यक्तीने महाराष्ट्र सरकारला जेरीस आणले आहे. मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा, असंही संजय राऊतांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नांदेडमधील काॅंग्रेसचा मोठा नेता शिवसेनेत, अशोक चव्हाणांना बसला मोठा धक्का
हेही वाचा…“शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी वातावरण तयार केलं जातंय”, वकील असीम सरोदे यांचा दावा
हेही वाचा…रिक्षा डंपर भरून माझ्याकडे पुरावे, सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं, जरांगे पाटलांचं विधान
हेही वाचा…“चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल, पण जनरल डायरचं काय?” आदित्य ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…काहीही करून मुख्यमंत्र्यांच्या मुलाला घरी बसवायचंय, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना, मोठी रणनीति तयार