मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकारकडून जरांगे पाटील यांना बोलवण्यात आलं आहे. आज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले असून यामध्ये १३ तज्ञ आणि ८ गावकऱ्यांचा समावेश असणार आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले,” प्रकाश आंबेडकरांची टिका
मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या तरूणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावत आहोत. असेही त्यांनी यावेळी सांगितले. या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाच्या प्रत्येक तरूणाने घ्यावा असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू, शिवसेना पक्षफुटीचा अजित पवार गटाने दिला संदर्भ”
दरम्यान, सरकार जर अध्यादेशात बदल करून देणार असेल तर आम्हीही दोन पावलं मागे येण्यास तयार आहोत, असं जरांगे पाटलांनी सांगितले आहे. आंदोलनाला मिळत असलेला पाठींबा पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता बळावली असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…अन् ठाकरेंच्या हातात ठेवली लहान मुलानं लोणचं आणि भाकरीची शिदोरी, म्हणाले, हीच आमची..,
हेही वाचा…फडणवीसांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या, भाजपची मुंबईत तातडीची बैठक
हेही वाचा…“आमची भाजी भाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका”, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षण पेटणार