पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतरही मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम असून उपोषण त्यांनी सुरूच ठेवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता ओबीसी आरक्षण देण्यासाठी प्रकाश शेंडगे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“हिंदुत्व आणि मोदीत्व असतानाही भाजपला निवडणुक कठीण जाईल”
मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. यातच आमची भाजीभाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणासाठई उपोषण करत आहेत. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. त्यांनी ही मागणी सोडून द्यावी अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
हेही वाचा…“सरकारचं आमच्यावर लक्ष नाही, आम्हाला न्याय मिळवून द्या,” बांधावरच शेतकऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
दरम्यान, मराठा समाजातील ज्या व्यक्तींच कुणबी अशी निजामकालीन नोंद असेल त्यांना इतर मागास प्रवर्गातील दाखले दिले जातील. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. त्यानंतर आज शासनाने जीआर देखील काढला आहे. मात्र सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. आज शासनाचा जीआर घेऊन आमदार अर्जून खोतकर पोहचले, परंतु जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले.
READ ALSO :
हेही वाचा…“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले,” प्रकाश आंबेडकरांची टिका
हेही वाचा…“राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू, शिवसेना पक्षफुटीचा अजित पवार गटाने दिला संदर्भ”
हेही वाचा…” राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ३१ बंडखोर आमदारांना अपात्र करा,” शरद पवार गटाची निवडणुक आयोगात याचिका
हेही वाचा…“‘पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही?” ठाकरेंचा सरकारला सवाल
हेही वाचा…नागपूर कोर्टाचा फडणवीसांना मोठा दिलासा, “9 वर्षाच्या ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फडणवीसांची केली निर्दोष मुक्तता”