अहमदनगर : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचा पाहाणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी शासनाचं फक्त शासन आपल्या दारी कार्यक्रमावर लक्ष म्हणून ठाकरेंनी सरकारवर संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना धीर दिला.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला अर्ध्या रस्त्यातच गाडीतून खाली उतरवलं, अन् हातपाय तोडण्याची दिली धमकी
दुष्काळाचा फटका राहता तालुक्यातील कोरहाळे गावाला सुद्धा बसला असून, अशावेळी पाण्याअभावी करपून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी उद्धव ठाकरे ह्यांनी केली. पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच पावसाअभावी पिकं करपून गेली असताना, शेतकऱ्यांना कुणी वाली नाही. घटनाबाह्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा…“खोके पॅटर्न आता सरकारी नोकर भरतीमध्येही सुरू,” वडेट्टीवारांचा ट्रीपल इंजिन सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अहमदनगरच्या काकडी येथे दुष्काळाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळई शेतकऱ्यांनी सरकारचं आमच्याकडे लक्ष नसल्याचा आरोप केला. आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी ठाकरेंकडे केली. त्यावर शासनाचं फक्त शासन आपल्या दारी कार्यक्रमावर लक्ष आहे. या कार्यक्रमासाठी खर्च केला जातो पण आम्हाला मदत केली जात नसल्याची तक्रारही त्यांनी ठकारंकडे केली.
READ ALSO :
हेही वाचा…नागपूर कोर्टाचा फडणवीसांना मोठा दिलासा, “9 वर्षाच्या ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फडणवीसांची केली निर्दोष मुक्तता”
हेही वाचा…“हिंदुत्व आणि मोदीत्व असतानाही भाजपला निवडणुक कठीण जाईल”
हेही वाचा…“सरकारचं आमच्यावर लक्ष नाही, आम्हाला न्याय मिळवून द्या,” बांधावरच शेतकऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
हेही वाचा…“लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका”, भाजप आमदाराचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
हेही वाचा…भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, विखे पाटील म्हणाले, “भंडारा उधळणाऱ्यांवर.., “