पुणे : आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं अशी टिप्पणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याचशिवाय काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले असल्याची टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
हेही वाचा…“सरकारचं आमच्यावर लक्ष नाही, आम्हाला न्याय मिळवून द्या,” बांधावरच शेतकऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
भाजप-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत. इंडिया आघाडीत येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात ? लालू प्रसाद यादव आणि स्टॅंलिन या शुद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका”, भाजप आमदाराचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
दरम्यान, अलिकडेच इंडियाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आलं नाही. यावरून मोदीविरूद्ध लढणाऱ्या प्रत्येक पक्षाला, संघटनेला आघाडीत निमंत्रण आहे. अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आली होती. त्यावर आता आंबेडकरांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू, शिवसेना पक्षफुटीचा अजित पवार गटाने दिला संदर्भ”
हेही वाचा…” राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ३१ बंडखोर आमदारांना अपात्र करा,” शरद पवार गटाची निवडणुक आयोगात याचिका
हेही वाचा…“‘पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही?” ठाकरेंचा सरकारला सवाल
हेही वाचा…नागपूर कोर्टाचा फडणवीसांना मोठा दिलासा, “9 वर्षाच्या ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फडणवीसांची केली निर्दोष मुक्तता”
हेही वाचा…“हिंदुत्व आणि मोदीत्व असतानाही भाजपला निवडणुक कठीण जाईल”