मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटप्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने निवडणुक आयोगाने आपापलं उत्तर दाखल केलं आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला उत्तर सादर करण्याची मुदत निवडणुक आयोगाने ९ सप्टेंबर देण्यात आली होती. या उत्तरात राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ४० आमदारांना अपात्र करा, अशी मागणी देखील शरद पवार गटाने केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचीही लढाई सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“लांडग्या ‘काका’च्या नादाला लागू नका”, भाजप आमदाराचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
निवडणुक आयोगात अजित पवार गटाने दाखल केलेले दावे शरद पवार गटाने फेटाळून लावले आहेत. याशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नऊ मंत्र्यांच्या शिवाय ३१ आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. यामध्ये विधान परिषदेतील ४ आमदारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…भंडारा उधळला, पोलिसांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, विखे पाटील म्हणाले, “भंडारा उधळणाऱ्यांवर.., “
दरम्यान, शरद पवार गटाने उत्तर दाखल केल्यानंतर आता अजित पवार गटाने देखील निवडणुक आयोगात उत्तर सादर केलं आहे. या उत्तारात अजित पवार गटाने शिवसेना पक्ष फुट प्रकरणाचा संदर्भ दिला आहे. यामध्ये निवडणुक चिन्ह आणि पक्षनावावर आपला दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार असल्याचं संकेत मिळत आहेत. परंतु अद्याप निवडणुक आयोगाने पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तरं ऐकल्यानंतर आयोग किती वेगाने सुनावणी करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…” राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ३१ बंडखोर आमदारांना अपात्र करा,” शरद पवार गटाची निवडणुक आयोगात याचिका
हेही वाचा…“‘पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही?” ठाकरेंचा सरकारला सवाल
हेही वाचा…नागपूर कोर्टाचा फडणवीसांना मोठा दिलासा, “9 वर्षाच्या ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फडणवीसांची केली निर्दोष मुक्तता”
हेही वाचा…“हिंदुत्व आणि मोदीत्व असतानाही भाजपला निवडणुक कठीण जाईल”
हेही वाचा…“सरकारचं आमच्यावर लक्ष नाही, आम्हाला न्याय मिळवून द्या,” बांधावरच शेतकऱ्यांची ठाकरेंकडे मागणी