मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आज भाजपच्या आजी माजी आमदार, खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. या बैठकीची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे.
हेही वाचा…नागपूर कोर्टाचा फडणवीसांना मोठा दिलासा, “9 वर्षाच्या ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फडणवीसांची केली निर्दोष मुक्तता”
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. गरवारे क्लबमध्ये बोलवण्यात आलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये जे आमदार, खासदार सोशल मिडीयावर सक्रीय नाहीत. त्यांना सक्रिय होण्याचे आदेश बैठकीत पदाधिकाऱ्यांना फडणवीसांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“हिंदुत्व आणि मोदीत्व असतानाही भाजपला निवडणुक कठीण जाईल”
दरम्यान, राज्यात अजित पवार यांच्या सत्ता सहभागामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. यातच राज्यातील ४८ पैकी ४८ जागा महायुती जिंकेल, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी देखील आगामी निवडणुकांची तयारी करतांना दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आमची भाजी भाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका”, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षण पेटणार
हेही वाचा…“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले,” प्रकाश आंबेडकरांची टिका
हेही वाचा…“राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू, शिवसेना पक्षफुटीचा अजित पवार गटाने दिला संदर्भ”
हेही वाचा…” राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ३१ बंडखोर आमदारांना अपात्र करा,” शरद पवार गटाची निवडणुक आयोगात याचिका
हेही वाचा…“‘पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही?” ठाकरेंचा सरकारला सवाल