मुंबई : आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. यानंतर सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच आपल्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले. जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तिथून ते आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात. असा जोरदार हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, आयुक्त तिथे बसलेले त्यांना शिवी घालत होते. या जरांगे यांनी २७ तारखेला गुलाल उधळला आणि तिकडे जाऊन पुन्हा १० तारखेला उपोषणाला बसले. गाड्या फोडल्या, असा आरोपही भुजबळांनी जरांगे पाटलांवर केला. याचबरोबर अजय महाराज बारस्कर यांचा दाखला देत भुजबळ यांनी या महाराजांनीसुद्धा हे ऐकणारे नाहीत असे म्हटले आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध का ? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार
यांचे मारूतीचे शेपुट वाढतच जाणार असे म्हटल्याचे सांगितले. तसेच हे धमक्या देत आहेत. आम्ही बोललो की आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. असा आरोपही त्यांनी केला. यावर भुजबळ यांना उद्देशुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, तुमच्या सुरक्षेला धोका आहे याची नोंद मी घेतली आहे. सरकारने त्याची योग्य दखल घ्यावी, असे आदेश मी देत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार हे विशेष अधिवेशन स्थगित करत असल्याची घोषणाही त्यानंतर नार्वेकर यांनी केली.
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!” शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं
दरम्यान, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचा कायदा पास झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जाहिराती निघतील तेथे मराठा समाजासाठी आरक्षण लागू होईल. असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकराने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मांडले आहे. दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक झाली आहे. महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले नाही. असा घणाघात आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“४२ वर्षापासूनचा लढा यशस्वी..!” कोर्टातही मराठा आरक्षण टिकणार, महेश लांडगे यांचा विश्वास
हेही वाचा…“आता जाहिराती निघतील, मंजुर झालेलं आरक्षण लागू होणार का ?” देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारची नौटंकी”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले पहिल्यांदाच आभार म्हणाले, “ज्या निर्दयीपणाने डोकी फोडली..”
हेही वाचा…“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”, अन् म्हणे मंत्री, नारायण राणेंचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत