सांगली : जो काही विचार राजाराम बापूंनी दिलेला आहे. तो चालवण्याचे काम आज तितक्याच कष्टाने आणि तितक्याच जोमाने जयंतरावर करत आहेत. त्या जयंतराव यांच्या पाठीशी जशी बापूंना साथ दिली, तशी अखंडपणे तुम्ही देखील द्या. तुम्हाला खात्रीने सांगतो की, बापूंच्या नंतर जयंत रावांच्या रुपाने महाराष्ट्राच्या तरुण पिढीमध्ये उत्तम प्रकारचे प्रशासक आणि संघटक जे तयार झालेत. त्यामध्ये जयंत रावांची उंची ही अतिशय महत्त्वाची आहे. असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारा यांनी जयंत पाटील यांचे कौतूक केले आहे. सांगली येथे आयोजित स्व. राजाराम बापू पाटील पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
हेही वाचा…जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड!
आज राजाराम बापू साखर कारखाना असो किंवा त्या परिसरात अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत. जयंतराव यांच्या विचाराने आणि नेतृत्वाने त्या चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत. ते पाहिल्यानंतर त्यांनी पाया घातला. त्यांच्या दृष्टीतून हे सर्व उभं राहिलं ते कसं चालतंय हे आपण पाहत आहोत. हे चालवण्याचे, उभे करण्याचे काम बऱ्याच वेळेला बापू स्वतः सत्तेमध्ये नसताना झाले आहे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. विरोधी पक्षात देखील आम्ही एकत्रित काम केले. मला आठवतंय की, शेतीमालाच्या किंमती संदर्भात एक वाद आमचा झाला आणि नागपूरला अधिवेशन होतं तिथे त्यावर चर्चा व्हावी असा आग्रह होता. आम्ही लोकांनी बसून ठरवले, बापूही सोबत होते की, जळगावपासून नागपूरपर्यंत एक दिंडी काढायची आणि ती आम्ही लोकांनी काढली. माझ्या आणि बापूंच्या वयात फरक होता, मी तरुण होतो पण, काही दिवसात माझे पाय दुखायला लागले मी मध्येच दोन दिवस सुट्टी घेतली, पण हा सगळा एकंदर जो प्रवास होता जळगाव ते नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रवासामध्ये एक तास देखील कधी विश्रांती घेतली नाही. असं म्हणत शरद पवारांनी जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला.
हेही वाचा…ठाकरेंची धडकी भरवणारी महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या विरोधात फोडला बॉ’म्ब , २०१३ अन् २०१८ चा दाखवला व्हिडीओ
पुढे बोलतांना ते म्हणाले की, दोन लोक कायम त्या दिंडीत चालले ते म्हणजे राजा बापू पाटील आणि दुसरे राजाभाऊ एनजी पाटील; कायमच सातत्याता ठेवली आणि म्हणून कितीही कष्ट करायचे असले विचार लोकांपुढे मांडायचा आणि लोकांचे दुखणे हे सत्ताधाऱ्यांसमोर मांडून त्याची सोडवणूक करून घ्यायची त्यासाठी कितीही त्रास झाला, तर खूप त्रास सहन करण्याचा दृष्टिकोन हा तेव्हा सगळ्यांमध्ये होता आणि म्हणून मला आनंद आहे की, आज कष्ट करणाऱ्या महाराष्ट्रासाठी, त्याग करणाऱ्या समाजासाठी, मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचे अखंड स्मरण पुढच्या पिढीला होण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा नव्या पिढी समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेने अतिशय देखणा पुतळा या ठिकाणी उभा केला. पुतळ्याचे अनावरण करायचे म्हटल्यावर मी खूप विचार केला, कारण बऱ्याच ठिकाणी पुतळ्यांना ओळखताच येत नाही तो पुतळा त्यांचाच आहे हे सांगता येत नाही, पण हा पुतळा बघितल्यानंतर साक्षात बाप्पू आपल्यासमोर उभे आहेत याची प्रचिती या पुतळ्यामध्ये दिसते त्यांची दृष्टी त्यांचा चेहरा या सगळ्या गोष्टी तंतोतंत बापू समोर आपण आहोत असा बनवलेला आहे म्हणून ज्यांनी हे काम केले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरे गटाचे महानाटकही फसले अन् राऊतांनी पु्न्हा एका उद्धव ठाकरेंना फसवले”
हेही वाचा…गडचिरोलीत 10,000 कोटींचा ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट, देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
हेही वाचा…“व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा,” शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव
हेही वाचा…अध्यक्षांच्या निर्णयाची ठाकरे गटाकडून चिरफाड, आता नार्वेकरांची पत्रकार परिषद म्हणाले…
हेही वाचा…“आता जनतेनं ठरवावं की कुणाला गाडावं अन् कुणाला पुरावं”, ठाकरेंची महापत्रकार परिषद, विरोधकांना भरली धडकी