मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची आज ठाकरे गटाने चिरफाड केली आहे. अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात आज ठाकरे गटाने महापत्रकार परिषदेत काही पुरावे आणि तसेच व्हिडीओ दाखवले. यामध्ये ज्या राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाने दिलेली पक्षाची घटना स्विकारली नाही. त्याच कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मंजूर होतांना स्वत: राहुल नार्वेकर शिवसैनिक असतांना हजर असल्याचा व्हिडीओ देखील ठाकरे गटाकडून दाखवण्यात आला आहे. यातच ठाकरे गटाने २०१३ आणि २०१८ च्या कार्यकारिणी बैठकीचे व्हिडीओ देखील दाखवण्यात आले आहेत. यावर आता राहुल नार्वेकर काय प्रत्युत्तर देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…मुंबईत पत्रकार परिषदांचा पाऊस, ठाकरेंच्या महापत्रकार परिषद नंतर नार्वेकरांचीही पत्रकार परिषद
२३ जानेवारी २०१३ च्या राष्ट्रीय कार्यकारिणमधील शिवसेना पक्षाने केलेले ठराव व पक्ष घटना दुरूस्ती यासंदर्भात ठाकरे गटाने पुरावा दिला आहे. त्यात
१. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की, ‘शिवसेनाप्रमुख’ हे दैवी संज्ञा केवळ स्व. बाळासाहेबांनाच शोभून दिसते, म्हणून या पुढील पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला ‘शिवसेनाप्रमुख’ ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेनाप्रमुख ही संज्ञा गोठविण्यात येत आहे.
2. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की, ‘शिवसेना पक्षप्रमुख’ हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल. शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत ५ वर्षांसाठी असेल.
3. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की, शिवसेना पक्षातील ‘कार्यकारी अध्यक्ष’ (वर्किंग प्रेसिडेंट) हे पद या पुढे रद्द करण्यात येत आहे.
४. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की, आदरणीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुख (अध्यक्ष) म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख (अध्यक्ष) यांच्याकडे सोपविण्यात येत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील, पक्ष घटनेच्या आठव्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केंव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील. पक्ष घटनेच्या अकराव्या कलमानुसार पक्षासंदर्भातील सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील.
5. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या (३१) असेल. यापैकी एकवीस (२१) जागा पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित दहा (१०) जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील. शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशान्वये कार्यरत असतील.
6. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की, युवा सेनेला शिवसेनेची अंगिकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे. युवा सेना व युवा सेनाप्रमुख यांचा पक्ष घटनेच्या बाराव्या कलमात (कामगार संघटना आणि आघाड्या) समावेश करण्यात येत आहे.
२०१३ ते २०१८ या काळात निवडणूक आयोगाने शिवसेनेशी केलेले पत्र व्यवहार व त्यात शिवसेना पक्षप्रमुख यांचा म्हणून केलेला उल्लेख देखील ठाकरे गटाने दाखवला तसेच त्यानंतर २३ जानेवारी २०१८ साली देखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकारिणीत तीन ठराव मांडण्यात आले होते.
हेही वाचा…सोलापूरात शरद पवार गटाला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात दाखल होणार
पक्ष घटना दुरुस्ती ठराव – १
पक्ष घटनेच्या कलम ८ मधील संघटनात्मक रचना (Organisational Structurel अंतर्गत, नियुक्ती कोष्टक (Schedule-B) मध्ये उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व कार्यालप्ामुख तसेच शहरासाठी (For Cities) उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व कार्यालयप्रमुख ही पढे नमूद करणे आवश्यक आहे. सदर तिन्हीं पड़े पक्ष संघटनेत सुरुवातीपासुनत कार्यान्वित असून शिवसेना पक्षांच्या संघटनाभक संरचनेतील महत्वाची पदे आहेत. पक्षकार्य व निवडणुकीसाठीचे प्रचार व प्रसार कार्य प्रभावीरित्या करून शिवसेनेला निवडणुकीत यश मिळवून देण्यात हे पदाधिकारी महत्वाची भूमिका बजावत असतात. परंतु पक्ष घटनेमध्ये त्यांचा समावेश झाला नव्हता, शिवसेनापक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी (शिवसेना नेते। बैठकीत उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व कार्यालयात्गुख या पदांची गॉव पक्षघटनेत करण्याचा निर्णय घेतला व राष्ट्रीय कार्यकारिणीने शिवसेनापक्षप्रमुखांचा निर्णय एकमताने मान्य केला. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की, उपशाखामुख, गटप्रमुख व कार्यालयप्रमुख या पांचा पक्ष घटनेच्या कलम ८ मध्ये समावेश करण्यात येत आहे.
पक्ष घटना दुरुस्ती ठराव – २
आदरणीय हिंदुस्वयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला ५१ वर्षे पूर्ण होऊन आज शिवसेनापक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील एक मजबूत राजकीय पक्ष म्हणून शिवसेना कार्यरत आहे. पक्षकार्याची व्याप्ती अनेक पटींनी वाढल्यामुळे पक्षसंघटनेत काही नवीन पदे निर्माण करण्याची आवश्यकता वाटल्याने शिवसेनापक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी (शिवसेना नेते) बैठकीत समन्वयक’ हे पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला व राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षप्रमुखांचा निर्णय एकमताने मान्य केला. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की, ‘समन्वयक’ हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे व या पदाचा पक्ष पाहनेच्या कालम ८ मध्ये समावेश करण्यात येत आहे. याला सुचक म्हणून अॅड लिलाधर डाके तर अनुमोदक म्हणून दिवाकर रावते यांनी दिलं होतं.
पक्ष घटना दुरुस्ती ठराव – ३
आदरणीय हिंयुदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला ५१ वर्षे पूर्ण होऊन आज शिवसेनापक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील एक मजबूत राजकीय पक्ष म्हणून शिवसेना कार्यरत आहे, पक्षकार्याची व्याप्ती अनेक पटींनी वाढत्यामुळे पश्नसंघटनेत काही नवीन पढे निर्माण करण्याची आवश्यकता वाढल्याने शिवसेनापक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे चांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी (शिवसेना नेते) बैठकीत ‘संघटक हे पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला व राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षप्रमुखांचा निर्णय एकमताने मान्य केला. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की, ‘संघटक’ हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे व या पदाचा पक्ष घटनेच्या कलम ८ मध्ये समावेश करण्यात येत आहे. याला सुचक म्हणून दिवाकर रावते तर अनुमोदक म्हणून संजय राऊत यांनी दिलं होतं.
READ ALSO :
हेही वाचाठाकरेंची धडकी भरवणारी महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या विरोधात फोडला बॉ’म्ब , २०१३ अन् २०१८ चा दाखवला व्हिडीओ
हेही वाचा…“राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल असीम सरोदेंनी केला चिरफाड”, पाहा नेमकं काय घडलंय?
हेही वाचा…ठाकरेंची महापत्रकार परिषद..! “त्यामुळे एकनाथ शिंदेंसह सर्वजण अपात्र ठरतात,” असीम सरोदे यांनी सांगितलं कारण
हेही वाचा…“महाराष्ट्राचे रोजगार गुजरातमध्ये पळवले जात असताना राज्य सरकार मात्र केवळ केंद्राचं मांडलिक बनून गप्प बसलंय”
हेही वाचा…“मुंबईला कमजोर करण्याचा ‘हा’ घ्या आणखीन एक पुरावा,” मुख्यमंत्री यावर उत्तर देणार का ?