मुंबई : हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यंदाही होणार आहे. हे फिल्मफेअरचं यंदाचं ६९ व वर्ष असून दरवर्षी मुंबईत होणारा हा पुरस्कार सोहळा यंदा गुजरातला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महत्वाच्या तीन प्रकल्पानंतर आता फिल्मफेअरही गुजरातला गेला असा सूर राजकीय क्षेत्रातून उमटू लागला आहे. काल जियो वर्ल्ड सेंटर येथे फिल्मफेअरकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली होती. त्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, कोण कोण असणार ? उत्सुकता शिगेला पोहचली
मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा, असं म्हणत जंयत पाटलांनी यावर संताप व्यक्त केला आहे. दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिप्ट येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले. डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे. बॉलिवूड हे मुंबईचे अविभाज्य घटक आहे. बॉलिवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोतावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. यावर मुख्यमंत्री काय उत्तर द्याल. असा सवाल देखील जयंत पाटलांनी केलाय.
हेही वाचा…” राज्य सरकारकडून जनतेच्या पैशांची खुलेआम लूट”, दावोस दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंची जोरदार टिका
सामान्यपणे एखाद दुसरा अपवाद वगळता बॉलिवूडनगरी असलेल्या मुंबईत ‘फिल्मफेअर सोहळा’ होत असतो, पण आज फिल्मफेअर सोहळ्यासह गुंतवणुकीपासून तर जे जे भव्य दिव्य ते ते सर्व केवळ गुजरातमध्येच नेलं जात असल्याचं चित्र देशात निर्माण झालं.. देशात गुजरात जरी असलं तरी इतरही 29 राज्ये आहेत… त्यामुळं केवळ गुजरात म्हणजे देश नाही. हाती देशाची सत्ता आहे म्हणून त्याचा वापर केवळ आपल्याच राज्यासाठी केला जात असेल तर हे विसंगत असून ते संविधानालाही अभिप्रेत नाही. मुंबईत बॉलीवुडच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 7 लाख लोकांना रोजगार मिळतो आणि फिल्मफेअर सोहळा हा त्याचा एक भाग आहे. त्यामुळं याबाबत स्वाभिमानी महाराष्ट्राने आवाज उठवण्याची गरज आहे. पण महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार भरदिवसा गुजरातमध्ये पळवले जात असताना राज्य सरकार मात्र केवळ केंद्राचं मांडलिक बनून गप्प बसलंय, हे दुर्दैव! असा घणाघात रोहित पवारांनी सरकारवर केला आहे.
हेही वाचा…“मी मटण खातो; मटण, म्हणजेच मांसाहार करतो”, जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांवर पलटवार
दरम्यान, राज्यात महायुती सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. पंरतु यावर राज्य सरकार गुपचिप राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर सवाल उपस्थित केले गेले की केंद्रातील सरकार आपल्याला यापेक्षा मोठा प्रकल्प देणार अशी टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न कधी थांबणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सामान्यपणे एखाद्-दुसरा अपवाद वगळता बॉलिवूडनगरी असलेल्या मुंबईत ‘फिल्मफेअर सोहळा’ होत असतो, पण आज फिल्मफेअर सोहळ्यासह गुंतवणुकीपासून तर जे जे भव्य दिव्य ते ते सर्व केवळ गुजरातमध्येच नेलं जात असल्याचं चित्र देशात निर्माण झालं.. देशात गुजरात जरी असलं तरी इतरही 29 राज्ये आहेत…… pic.twitter.com/fb65cVjnJk
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईला कमजोर करण्याचा ‘हा’ घ्या आणखीन एक पुरावा,” मुख्यमंत्री यावर उत्तर देणार का ?
हेही वाचा…मुंबईत पत्रकार परिषदांचा पाऊस, ठाकरेंच्या महापत्रकार परिषद नंतर नार्वेकरांचीही पत्रकार परिषद
हेही वाचा…सोलापूरात शरद पवार गटाला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात दाखल होणार
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना मिळाली रश्मी ठाकरेंची ताकद, शिंदे गटाला धुळ चारण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात
हेही वाचा…“आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे अन् काही तरी..,”सरकारच्या पडद्यामागील हालचालींबाबत जरांगे पाटलांची साशंकता