जालना : मराठा समाजासाठी येत्या २० तारखेपासून मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलकांसोबत मुंबईच्या दिशेने कुच करणार आहे. त्यासाठी तयारी मराठा समाजाकडून जोरात सुरू केली आहे. याच दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या काही पडद्यामागील हालचालींबाबत साशंकता व्यक्त केली आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी अघटित घडवायचे असे नियोजन आखले जात असल्याची शंका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला मराठा आंदोलनावर सगळ्याचं लक्ष राहणार आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात राहून मराठी जणांनी जमीन गमावली तर उद्या…” राज ठाकरेंनी दिला धोक्याचा इशारा
सरकार मला ट्र्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यमागे खूप मोठं षडयंत्र रचले जात आहे. मला शब्दात अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काही तरी अघटित घडवायचे असे नियोजन आखले जात असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…गौतमी अदानी ते विविध देशांतील प्रमुखांशी चर्चा, असा असणार मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा
दरम्यान, यातच मुंबईत काढण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. यामध्ये बच्चू कडू, संदीपान भूमरे आणि मंगेश चिवटे यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. दुपारी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. यातच आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारचं शिष्टमंडळ फायनल ड्राप्ट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, कोण कोण असणार ? उत्सुकता शिगेला पोहचली
हेही वाचा…” राज्य सरकारकडून जनतेच्या पैशांची खुलेआम लूट”, दावोस दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंची जोरदार टिका
हेही वाचा…“मी मटण खातो; मटण, म्हणजेच मांसाहार करतो”, जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांवर पलटवार
हेही वाचा…ना नामदेव ना रामदास..! चौथाच व्यक्ती निघाला शरद मोहोळचा मारेकरी, जुना वाद, अन् काढला काटा
हेही वाचा“मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले अन् देवरांना नवे व्हिजन मिळाले”,ठाकरे गटाची जोरदार टीका