मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधी जागति आर्थिक परिषद होत आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत राज्य सरकारचं शिष्टमंडळ उद्या दावोसला रवाना होणार आहेत. या परिषदेतील प्रमुख बैठकीत नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे दहा जणांचे शिष्टमंडळ दावोसला जाणार आहेत. एमएमआरडीए व महाप्रित येथील ८ अधिकारी स्वतंत्ररित्या सहभागी होत असून या सर्वांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या दौऱ्यामध्ये खाजगी विमानाचा वापर होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा….“अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकरांना सोडली,” केंद्रीय राज्यमंत्र्यांचं मोठं विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून गेल्या वर्षी या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले असून यंदा या परिषदेच्या माध्यमातून सूमारे अडीच लाख कोटीची गुंतवणूक होईल असे नियोजन करण्यात आले आहे. ही गुंतवणूक वाढू देखील शकते. पोलाद, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योग, आण्विक ऊर्जा व नवीनकरणीय ऊर्जा स्रोत-ग्रीन हायड्रोजन, हिरे व आभूषणे,डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह त्याचबरोबर कृषी- औद्योगिक , कृषी आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत. यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून २० सामंजस्य करार केले जाण्याची शक्यता आहे.
या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाजवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हिलियन) उभारण्यात आले असून याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. तसेच मुख्यमंत्री हे प्रमुख विदेशी उद्योगाच्या प्रमुखांशी देखील चर्चा करणार आहेत, यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत असून महाराष्ट्राच्या घोडदौडीची माहिती देणारे दृक श्राव्य प्रदर्शन देखील भरविण्यात आले आहे. उद्या, १६ जानेवारी रोजी उद्या, १६ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन होणार आहे. ओमानचे उद्योग मंत्री, सौदीचे वित्त मंत्री, दक्षिण आफ्रिकेचे उर्जा मंत्री, दक्षिण कोरियाच्या ग्योगी प्रांताचे गव्हर्नर तसेच डीपी वर्ल्ड ( DP World), लुईस ड्रेफस (Louis Dreyfus ) वित्कोविझ एटोमिका (Witkowitz Atomica), या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्न प्रक्रिया गटाचे सदस्य देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या दिवशी संध्याकाळी प्रमुख प्रतिनिधी व मान्यवरांना महाराष्ट्रातर्फे स्नेहभोजन आयोजित केले आहे.
हेही वाचा…५० लोकांचा ताफा सोबतीला अन् त्यांच्यासाठी ३४ कोटींचा खर्च ; मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा चर्चेत
मिशेल एडब्ल्यूएस (Michael aws), लिकस्टनस्टाईनचे (Liechtenstein)चे राजकुमार, हिताची कंपनीचे एमडी, कार्ल्सबर्ग ग्रुप (Carlsberg Group), दस्सो सिस्टिम्स (Dassault Systems), व्होल्व्हो कार्स च्या प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीस सहभागी होणार आहेत. स्विसच्या भारतातील राजदूतांसमवेत चर्चा देखील होणार असून यात ८ कंपन्यांचे सामंजस्य करार केले जातील. याशिवाय इतरही प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, माध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार आहेत.
दि. १७ जानेवारी रोजी गौतम अदानी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट असून त्यानंतर मुख्य कार्यक्रमात काँग्रेस सेंटरमध्ये ‘नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास’ या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले भाषण देतील. याशिवाय ‘कृषी, महिला सहभाग व अन्न सुरक्षा’ या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रात देखील ते सहभागी होतील. १८ तारखेस सीआयआयने गोलमेज परिषद आयोजित केली असून त्याला केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. कॅपजेमिनी (Capgemini), एपी मोलेर मर्स्क (AP Moller Maersk), बॉल कॉर्पोरेशन (Ball Corporation), यांच्या प्रमुखांशी पण गाठीभेटी होणार आहेत.
जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी तीन लाख दहा हजार कोटींचे करार करण्याचे नियोजन आहे, यामध्ये निपॉन आर सेलर मित्तल, इंडिया ज्वेलरी पार्क, एप्रिल पेपर, कंट्रोल एस, आयनॉक्स, ए बी ब्रिव्हरी, जिंदाल ग्रुप हुंदाई व अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सर्व करार परदेशी कंपन्यांशी केले जातील असे नियोजन करण्यात आले आहे. हे उद्योग राज्यात केवळ मुंबई, पुणे भागात न येता छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, जालना, रायगड अशा सर्वदूर ठिकाणी येतील.
READ ALSO :
हेही वाचा…श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याणमधून सुषमा अंधारेंना लोकसभेची उमेदवारी द्या, पदाधिकाऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
हेही वाचा…“शरद पवार गटातील ५ आमदार अन् २ बडे नेते अजिदादांच्या संपर्कात,” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…५० खोके, ५० लोकं, वऱ्हाड निघालं दाओसला ; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी नीट लक्ष देऊन एक तरी खासदार निवडून आणून दाखवावं, कुणी दिलं चॅलेंज ?”
हेही वाचा…ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव, नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्याविरोधात याचिका दाखल