मुंबई : दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या सहभागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३४ कोटी रूपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आलंय. झआपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतील जागेचे आरक्षण, दालनाचीउभारणी यासह शिष्टमंडळात सहभागी होणाऱ्या सदस्यांचा व्हिजा, विमान प्रवास, निवास, स्थानिक प्रवास खर्च व सुरक्षेसाठी १८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलीय. मागच्या वर्षी या दौऱ्यावर एमआयडीसीने ३२ कोटी ३१ लाख रूपये खर्च केला होता. यात मुख्यमंत्री एनकाथ शिंदे आणि काही सदस्यांच्या चार्टर्ड विमान प्रवासासाठी एक कोटी ८९ लाख रूपये मोजण्यात आले होते. यावरून आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…मिलिंद देवरांच्या प्रवेशामुळे दक्षिण लोकसभेची गणितं बदलली, भाजप दावा सोडणार, सावंत विरूद्ध देवरा असा सामना होणार
घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शइंदे दावोसला जवळपास ५० लोकांना घेऊन जाणार आहेत. यामध्ये काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेस असून मागचा दौरा केला होता तेव्हा २८ तासात ४० कोटी रूपये खर्च केले होते. आधी ५० खोके होते आता हे ५० लोकं घेऊन जात आहे. वऱ्हाड निघालयं लंडनला असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर जोरदार टिका केली आहे. सध्याचे खासदार, माजी खासदार, खाजगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची संपुर्णटीम मुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात कोणीही व्यावसायिक नाहीत. येथे ५० लोक काय करतील? तिथे फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील. सामंजस्य करारावर फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहे. इतके मोठे शिष्टमंडळ कशाला ? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…“२६ जानेवारीला मराठा आंदोलन मुंबईत धडकणार ,” कुठे मुक्काम कुठे जेवण ? जरांगे पाटलांनी दिली माहिती
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जेव्ही तुम्ही असा दौरा करतात तेव्हा वित्त विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागते. आता या दौऱ्यात १० लोकांची परवानगी दिली आहे. अशी माहिती आहे. त्यात आता इतर लोकांची परवानगी या केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे का ? या दौऱ्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत उद्योग मंत्री, खासदार, माजी खासदार सुद्धा आहेत. ज्यांना गुवाहाटी नेलं नाही. त्यांना वाटतं घेऊन जाताय. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी नीट लक्ष देऊन एक तरी खासदार निवडून आणून दाखवावं, कुणी दिलं चॅलेंज ?”
हेही वाचा…ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव, नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्याविरोधात याचिका दाखल
हेही वाचा….“अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकरांना सोडली,” केंद्रीय राज्यमंत्र्यांचं मोठं विधान
हेही वाचा…५० लोकांचा ताफा सोबतीला अन् त्यांच्यासाठी ३४ कोटींचा खर्च ; मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा चर्चेत
हेही वाचा…“गेम केला मास्टरमाईंडला सांगा,” शरद मोहोळ प्रकरणातील खऱ्या मास्टरमाईंटला अटक