मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधी जागतिक आर्थिक परिषद होत आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत राज्य सरकारचं शिष्टमंडळ दावोसला रवाना होत आहेत. या परिषदेतील प्रमुख बैठकीत नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. तर दावोस दौऱ्यावर जवळपास ५० लोक जाणार असून यात मुख्यमंत्र्यांना एक पीएस, १ पीए, ७ ओएसडी, ५ पद नसलेल्या व्यक्ती, दलाल आणि फिक्सर, ३ पीआरओ आणि काही नेते जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलंय.
हेही वाचा…श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याणमधून सुषमा अंधारेंना लोकसभेची उमेदवारी द्या, पदाधिकाऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
दावोस दौऱ्यासाठी ७० जणांचे शिष्टमंडळ जात आहे. यामध्ये अधिकारी, पीए, ओएसडी, लहान मुले यांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ही जनतेच्या पैशांची खुलेआम लूट आहे. एकीकडे अहोरात्र कष्ट करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोलून धरणाऱ्या अंगणवाडी भगिनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. तर दुसरीकडे मात्र करोडो रुपये सहलीसाठी उधळले जात आहेत. ही मोठी गंभीर बाब आहे. या उधळपट्टीचा निषेध. शासनाने आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून पैशांचा योग्य विनियोग कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी केलाय.
हेही वाचा…“शरद पवार गटातील ५ आमदार अन् २ बडे नेते अजिदादांच्या संपर्कात,” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
तर जवळपास ५० लोक ह्या दौऱ्यावर जाऊन काय करतील? त्यांनी नावं जाहीर करण्याआधी आम्हीच ती नावं जाहीर करू का? हे ५० लोक दावोसला जात नसतील तर उद्या परवा ते मुंबईत दिसणार आहेत का? की ते गुपचूप दावोसला जातील? तरीही कोणीतरी त्यांना तिथे नक्की पाहिलच. उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित नसताना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांचे OSD सोबत असण्याची आवश्यकता का पडावी? वर्तमान खासदार आणि माजी खासदार देखील शिष्टमंडळाचा एक भाग आहेत. शिष्टमंडळात त्यांची नेमकी भूमिका काय? असा सवाल ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित विभागातील फक्त १ अधिकारी आवश्यक असतो, अख्खा लवाजमा नाही. असाही टोला त्यांनी लगावला.
दावोस दौऱ्यासाठी ७० जणांचे शिष्टमंडळ जात आहे. यामध्ये अधिकारी, पीए, ओएसडी, लहान मुले यांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हि जनतेच्या पैशांची खुलेआम लूट आहे. एकीकडे अहोरात्र कष्ट करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोलून धरणाऱ्या अंगणवाडी भगिनी आपल्या…
— Supriya Sule (@supriya_sule) January 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मी मटण खातो; मटण, म्हणजेच मांसाहार करतो”, जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांवर पलटवार
हेही वाचा…ना नामदेव ना रामदास..! चौथाच व्यक्ती निघाला शरद मोहोळचा मारेकरी, जुना वाद, अन् काढला काटा
हेही वाचा“मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले अन् देवरांना नवे व्हिजन मिळाले”,ठाकरे गटाची जोरदार टीका
हेही वाचा…“महाराष्ट्रात राहून मराठी जणांनी जमीन गमावली तर उद्या…” राज ठाकरेंनी दिला धोक्याचा इशारा
हेही वाचा…गौतमी अदानी ते विविध देशांतील प्रमुखांशी चर्चा, असा असणार मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा