रायगड : आजपर्यंतच्या जगभरातील लढाया ह्या जमिनीच्या किंवा भूभागाच्या मालकी हक्कावरूनच झाल्या आहेत आणि मराठी जनांनी जमीन गमावली तर उद्या तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती पण गमवावी लागेल. शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू झाला, रायगड जिल्हा मुंबईशी थेट जोडला गेला. धनदांडग्यांना आपला रायगड जिल्हा हाकेच्या अंतरावर आला. खरंतर रस्ते हे प्रगतीचे वाहक असतात पण महाराष्ट्रात त्या प्रगतीमागून दबक्या पावलांनी येणारी समाजाची अवनती मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाव घालते. म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी जागल्याची भूमिका घ्यावी, जागृत राहावं… लोकांना शहाणं करावं. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव, नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्याविरोधात याचिका दाखल
गेल्या अनेक वर्षात या महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि मुंबईची वाट लागली आहे. तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे. बाकी राज्यात त्यांचे त्यांचे नेते त्यांच्या माणसाचे विचार करत असतात. पण आपल्या इथे असं होत नाही. मला कळलं की इथे काही गावंच संपली आहेत. मला कल्पना आहे की सर्वांना पैशाची गरज आहे. तुमची जमीन आहे ती तुम्हाला विकायची की नाही विकायची हा तुमचा प्रश्न आहे. पण त्याचा योग्य मोबादला तुम्हाला मिळतोय का ? मधला दलाल मराठी आहे असं समजून आपण जमीन विकतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा….“अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकरांना सोडली,” केंद्रीय राज्यमंत्र्यांचं मोठं विधान
काश्मीरमध्ये ३७० कलम काढलं, त्याने नक्की काय घडलं हे बाजूला. ३७० कलम होतं तेंव्हा तुम्ही तिकडे बाहेरच्यांना जमीन घ्यायला परवानगी नाही. हिमाचल, उत्तराखंड, आसाममध्ये बाहेरच्यांना जमीन घेता येत नाही मग महाराष्ट्रात का घेऊ दिल्या जात आहेत? काश्मीरमध्ये ३७० कलम काढलं, त्याने नक्की काय घडलं हे बाजूला. ३७० कलम होतं तेंव्हा तुम्ही तिकडे बाहेरच्यांना जमीन घ्यायला परवानगी नाही. हिमाचल, उत्तराखंड, आसाममध्ये बाहेरच्यांना जमीन घेता येत नाही मग महाराष्ट्रात का घेऊ दिल्या जात आहेत? आपण आपली जमीन वाचवली पाहिजे. आज महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे ते सर्वबाजूनी बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. असेही राज ठाकरेंनी सांगितले.
अलिबागच्या परिसरातील अनेक गावातील जमिनी आज विकल्या गेल्या आहेत. मला समजू शकतं की जमीन विकून मिळणारा पैसा प्रत्येकाला हवा आहे पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या घशात जात आहे, तुम्हाला पुरेसा भाव मिळतोय का ह्याची खात्री करून घेताय का? जगाचा इतिहास भूगोलाशिवाय नाही, सगळा खटाटोप जमिनीच्या मालकीसाठीच झाला. आज ट्रान्सहार्बर झालाय ह्यामुळे रायगडमधल्या जमिनी स्थानिक लोकांच्या हातातून जाणार, हे नक्की. आज दुबईमध्ये तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तिथल्या अरबांना भागीदार करून घ्यावं लागतं तरच तुम्ही तिथे व्यवसाय करू शकता… मग तुम्ही रायगडमध्ये सुरु होणाऱ्या व्यवसायांत तुम्ही भागीदार का होत नाही ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…गौतमी अदानी ते विविध देशांतील प्रमुखांशी चर्चा, असा असणार मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा
हेही वाचा…श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याणमधून सुषमा अंधारेंना लोकसभेची उमेदवारी द्या, पदाधिकाऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
हेही वाचा…“शरद पवार गटातील ५ आमदार अन् २ बडे नेते अजिदादांच्या संपर्कात,” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…५० खोके, ५० लोकं, वऱ्हाड निघालं दाओसला ; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी नीट लक्ष देऊन एक तरी खासदार निवडून आणून दाखवावं, कुणी दिलं चॅलेंज ?”