मुंबई : मागील दीड वर्षानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली. यामुळे उद्धव ठाकरे यांना उतरती कळा लागली. यातच भाजपने देखील ठाकरेंना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे तावून सुलाखून निघाले. यातच उद्धव ठाकरे यांना ताकद देण्यासाठी रश्मी ठाकरे देखील मैदानात उतरल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून स्त्री संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामाध्यमातून रश्मी ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात फिरून मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा…“मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले अन् देवरांना नवे व्हिजन मिळाले”,ठाकरे गटाची जोरदार टीका
शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार, खासदारांसोबत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण देखील उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटलं. परंतु पुन्हा जिद्दीने उभं राहत उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीची तयारी केली आहे. याचाच भाग म्हणून रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री संवाद यात्रा सुरू केली जाणार आहेत. या यात्रेची सुरूवात विदर्भातून झाली असून बुधवारी नागपूर जिल्हात दाखल होत आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात राहून मराठी जणांनी जमीन गमावली तर उद्या…” राज ठाकरेंनी दिला धोक्याचा इशारा
नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात ही यात्रा फिरणार असून रश्मी ठाकरे महिलांशी संवाद साधणार आहेत. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने सध्या शिंदे गटात असून ही जागा ठाकरेंसाठी महत्वाची आहे. रश्मी ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी व अन्य महिला नेत्या सोबत असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे अन् काही तरी..,”सरकारच्या पडद्यामागील हालचालींबाबत जरांगे पाटलांची साशंकता
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, कोण कोण असणार ? उत्सुकता शिगेला पोहचली
हेही वाचा…” राज्य सरकारकडून जनतेच्या पैशांची खुलेआम लूट”, दावोस दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंची जोरदार टिका
हेही वाचा…“मी मटण खातो; मटण, म्हणजेच मांसाहार करतो”, जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांवर पलटवार
हेही वाचा…ना नामदेव ना रामदास..! चौथाच व्यक्ती निघाला शरद मोहोळचा मारेकरी, जुना वाद, अन् काढला काटा