मुंबई : जे. पी. नड्डा म्हणाले होते की, देशात एकच पक्ष राहणार आहे. फक्त भाजप पक्ष असल्याचे ते म्हणाले होते आणि त्याची ही सुरूवात आहे. एका पक्षाचा अध्यक्ष उघडपणे सर्व पक्ष संपवून जाणार असल्याचे सांगत आहे. हे खूप घातक असून लोकशाहीच्या खुनाची सुरूवात झाली आहे.शिवसेना जर तुम्ही विकली असाल. तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे? राज्यपालांना विनंती करतो, एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला शिवसैनिकांच्या हातात शोभतो. असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषदेतून चढवला.
हेही वाचा…“मुंबईला कमजोर करण्याचा ‘हा’ घ्या आणखीन एक पुरावा,” मुख्यमंत्री यावर उत्तर देणार का ?
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची आज ठाकरे गटाकडून चिरफाड करण्यात आली आहे. अनिल परब यांनी शिवसेनेच्या संदर्भातील २०१३ आणि २०१८ च्या साली कार्यकारिणीची बैठक तसेच ठराव याचे व्हिडीओ दाखवण्यात आले. यातच ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांना आव्हान दिलंय. शिंदे आणि नार्वेकर यांनी पोलीस सुरक्षेशिवाय जनतेत यावं. मी पण येतो. त्यानंतर जनतेने ठरवावं की शिवसेना कुणाची. त्यानंतर जनतेनेचं ठरवावं की कुणाला गाडावं आणि कुणाला पुरावं. असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…मुंबईत पत्रकार परिषदांचा पाऊस, ठाकरेंच्या महापत्रकार परिषद नंतर नार्वेकरांचीही पत्रकार परिषद
दरम्यान, मला सत्तेचा मोह नव्हता. एका क्षणात मी वर्षा सोडलं आणि एका क्षणात मुख्यमंत्री पदही सोडलं. राज्यपालांनी जे अधिवेशन बोलवलं होतं. ते असंविधानिक होतं. आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार. की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार. हे पाहण्याची ही लढाई आहे. असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड!
हेही वाचाठाकरेंची धडकी भरवणारी महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या विरोधात फोडला बॉ’म्ब , २०१३ अन् २०१८ चा दाखवला व्हिडीओ
हेही वाचा…“राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल असीम सरोदेंनी केला चिरफाड”, पाहा नेमकं काय घडलंय?
हेही वाचा…ठाकरेंची महापत्रकार परिषद..! “त्यामुळे एकनाथ शिंदेंसह सर्वजण अपात्र ठरतात,” असीम सरोदे यांनी सांगितलं कारण
हेही वाचा…“महाराष्ट्राचे रोजगार गुजरातमध्ये पळवले जात असताना राज्य सरकार मात्र केवळ केंद्राचं मांडलिक बनून गप्प बसलंय”