मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने काल महापत्रकार परिषद घेऊन निकालाची भांडाफोड केली. उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेला जनता न्यायालय देऊन नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधातील पुरावे यावेळी ठाकरे गटाने व्हिडीओ आणि काही कागदपत्रे दाखवली. यावरून ठाकरे आणि शिंदे सरकारमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक पोस्ट करून ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…ठाकरेंची धडकी भरवणारी महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या विरोधात फोडला बॉ’म्ब , २०१३ अन् २०१८ चा दाखवला व्हिडीओ
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, भारतीय संविधानाच्या दहाव्या शेड्युलवर अॅड. असिम सरोदेंची व्याख्यानमाला आहे, असे निमंत्रण दिले असते, तर फार कुणी गेले नसते. पण, त्याला महापत्रपरिषद नाव देऊन आमच्या बिचार्या पत्रकार मित्रांचा छळ करण्यात आला. एकनाथ शिंदेंसोबत 56 पैकी 42 आमदार. पण ते दोन तृतियांश नाहीत, हा शोध आज असिम सरोदेंनी लावला. माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे किंवा माजी उपाध्यक्ष विजयकुमार औटी यांचे राजीनामा पत्र तत्कालिन शिवसेनेकडे आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा…“राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल असीम सरोदेंनी केला चिरफाड”, पाहा नेमकं काय घडलंय?
कितीही व्हिडिओ दाखविले किंवा आरडाओरड केली, तरी न्यायालय किंवा न्यायाधीकरण हे कायद्यानुसार चालत असते. त्यामुळे केलेले संपूर्ण बदल किंवा निवडणूक प्रक्रियेची माहिती रितसर निवडणूक आयोगाला कळवावी लागते, एवढे साधे जर अॅड. परबांना कळत नसेल तर तो निव्वळ कपाळकरंटेपणा आहे. 2013 चा कागद दाखविताना तसाच कागद 2018चा दाखवाल का? पत्रव्यवहारांचे कितीही कागदं दाखविले तरी त्यामुळे 2018 मध्ये नव्या निवडीची नोंद आयोगाकडे न केल्याची चूक लपविण्याचा अत्यंत लबाड प्रयत्न अॅड. परब यांनी केला. त्यापेक्षा ती चूक कबुल केली असती, तर महाराष्ट्राच्या जनतेला खरेपणा समजला असता. रेकॉर्डवरच्या नावानेच पत्रव्यवहार होत असतो. असेही त्यांनी सांगितलेय.
दरम्यान, विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रितसर निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि त्यांनी 1999 च्या माहितीनुसार, जे रेकॉर्डवर आहे, ते कळविले. 2018 ची माहिती रितसर आणि आयोगाच्या फॉर्मेटमध्ये पाठविली असती, तर मातोश्रीवरील बैठकीत सुभाष आणि अनिल देसाईंना इतकी झापझूप झालीच नसती. न्यायालयात प्रकरण सुरु असताना एकतर्फी पुराव्यांचा बाजार मांडणे, ही न्यायालयाची अवमानना आहे. हिंमत असेल तर एक महापत्रपरिषद दोन्ही गटांचे वकील बोलावून होऊन जाऊ द्या. तर ते लोकशाहीला, संविधानाला धरुन असेल. तुम्ही जे करताय, तेच मुळात लोकशाही, संविधानविरोधी आहे. जनतेच्याही न्यायालयात तुम्ही आज पराभूत झालात. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ऊबाठा गटाचे ‘महानाटक’ही फसले!
राऊतांनी पुन्हा एकदा उद्धवला फसवले…1) भारतीय संविधानाच्या दहाव्या शेड्युलवर अॅड. असिम सरोदेंची व्याख्यानमाला आहे, असे निमंत्रण दिले असते, तर फार कुणी गेले नसते. पण, त्याला महापत्रपरिषद नाव देऊन आमच्या बिचार्या पत्रकार मित्रांचा छळ करण्यात आला.…
— nitesh rane (@NiteshNRane) January 16, 2024
READ ALSO :
हेही वाचा…गडचिरोलीत 10,000 कोटींचा ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट, देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
हेही वाचा…“व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा,” शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव
हेही वाचा…अध्यक्षांच्या निर्णयाची ठाकरे गटाकडून चिरफाड, आता नार्वेकरांची पत्रकार परिषद म्हणाले…
हेही वाचा…“आता जनतेनं ठरवावं की कुणाला गाडावं अन् कुणाला पुरावं”, ठाकरेंची महापत्रकार परिषद, विरोधकांना भरली धडकी
हेही वाचा…जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड!