उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, भाजप आणि आणि अनिल देशमुख यांच्या कारवाईवर भाष्य केलं आहे.
“२०११-१२ ला ग्रामविकास मंत्री असताना, आम्ही जे सर्वेक्षण केलं, ते आमच्याकडून केंद्राकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. तेच त्यांनी अधिकृतपणे जाहीर करायला हवं होतं. मात्र, केंद्राने नंतर हे आकडे सर्वोच्च न्यायालयात दिले नाहीत आणि न्यायालायने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे, याबाबतीत केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं आहे,” असा आरोप त्यांनी केंद्रावर केला आहे
“जनतेवर अन्याय करून, कोणताही विकास करता येणार नाही”- प्रविण दरेकर
तसेच, “निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या गृहविभागाला, मुख्य सचिवांना महामारीची परिस्थिती आणि पावसाचा अंदाज घेत निवडणुकांची माहिती देणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांनी थेट निवडणूका जाहीर केल्या. त्यामुळे, राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्यालाच, आमचा विरोध आहे. याबाबत भुजबळ यांनी, काल पक्षाच्या बाजूची आणि राज्यातील ओबीसी समाजाची व्यथा मांडली आहे,” असं पाटील म्हणाले.
यावेळी, “भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ठराव मंजूर करून, अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करायची, म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा, हे अनाकलनीय आहे. भाजप अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहे. त्यांना देशातील केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्याची सवय लागलेली दिसते,” असं म्हणत, “या सगळ्या यंत्रणांचा वापर करून देखील देशमुखांकडे काहीच सापडत नाही म्हटल्यावर, त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार तपासायचे,” हा यंत्रणांचा गैरवापर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- भाजपविरोधी आघाडीवर संजय राऊत म्हणतात, “शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज…”
- मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी
- अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरात जोरदार निदर्शने, धरपकड सुरु
- मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं; महापौरांच सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर