मुंबई : ठाण्यातील चित्रपट गृहात प्रक्षेकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काल अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रभर त्यांनी तुरूंगात काढल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दुपारी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु सांयकाळी लगेच त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.
“आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात”; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य
न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना 15 हजार जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयाने काही अटी शर्ती देखील घालण्यात आल्या आहेत. यातच आज वर्तकनगर पोलिस स्टेशनमधून जितेंद्र आव्हाड बाहेर पडले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? काॅंग्रेसचा तिखट सवाल
जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी त्यांच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच त्यांच्याबाजून अॅड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला. तसेच आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद देखील कदम यांनी केला. परंतु न्यायालयाने त्यांना पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली.
“राष्ट्रवादीची साथ सोडा सांगून कंटाळलो, अन् निर्णय घेतला”; किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना काल पोलिसांनी अटक केली. त्यानंतर लगचेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. रात्रभर चाललेल्या या आंदोलन कर्त्यांना त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
Read also
- राजकारण पुन्हा तापलं…! जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी..!
- अन् राहुल गांधींसमोरच मांडला कुस्तीचा फड..! कोल्हापुरचे रांगडे गडी एकमेकांत लढले
- “महाराष्ट्राच्या हातून अजून एक प्रकल्प गेला, विरोधकांचा सरकारवर निशाणा
- “राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाही, अनेक नेते भाजप अन् शिंदे गटात येणार”
- किर्तीकरांनी पक्ष सोडला, राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले, “उद्यापासून लोक त्यांनाही…”;