कोल्हापुर : कोल्हापुर पोटनिवडणुकीचा आज फैसला लागणार आहे. भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडी आणि काॅंग्रेसकडून जयश्री जाधव यांची आज चुरशीची लढत होत आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीकडे लक्ष घालून होते. मात्र पहिल्या फेरीपासून जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. अकराव्या फेरीत देखील जयश्री जाधव याच आघाडीवर आहेत. मात्र कोल्हापुर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करूणा मुंडे यांना फक्त 61 मतं पडली आहेेत.
लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा! भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ
दहाव्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 39,605 तर सत्यजित कदम यांना 31,512 मते मिळाली आहेत. 8073 मताची आघाडी आहे. तर 8 हजार मतानी जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांच्यावर आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पहिल्यापासून आघाडीवर आहे. मात्र दहाव्या फेरीनंतर करूणा मुंडे यांना फक्त 61 मत मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.
“ते 100 टक्के खरं आहे”; मुंबई बॉम्ब स्फोटांबाबत शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
करूणा मुंडे यांनी भीमशक्ती पक्ष स्थापन करून त्यांनी या पोटनिवडणुकीच्या रिंगणार उतरल्या. मात्र त्यांना या निवडणुकीत फारसं यश येताना दिसत नाही. मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. त्यावेळी त्यांनी या निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार करत आपण या प्रकऱणी न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं. आचारसंहिता संपल्यानंतर देखील काॅंग्रेस आणि भाजपने मोठ्या जाहिरात देऊन प्रचाराच्या बातम्या दिल्यात.असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊन तर दाखवा; किशोरी पेडणकरांचं रवी राणांना खुलं आव्हान
दरम्यान, सुरूवातीपासून जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कोल्हापुरची पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे. यावर बोलताना जयश्री जाधव म्हणाल्या की, आम्ही सुरूवातीपासून आघाडी घेतली आहे. त्यामुळे लोकांचा कल हा आता दिसून आला आहे.
Read also:
- कोल्हापुर पोटनिवडणुक निकाल ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली आघाडी
- “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी! ते मुस्लिम, तर हे हिंदू समाजाला भडकविण्याचं काम करताहेत”
- मुंबईसह विदर्भातील एकुण 35 कार्यकर्त्यांनी ठोकला मनसेला रामराम! मशिदीवरील प्रकरण मनसेला भोवलं
- आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरे यांना सल्ला !म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यापेक्षा..;
- हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला जाणार की नाहीत; वसंत मोरेंनी स्पष्ट सांगितलं