मुंबई : २०१२ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना मुंबईच्या मध्यभागी आझाद मैदानावर लाजिरवाणा हिंसाचार घडला होता. अमर जवान ज्योतीची विटंबना झाली पण गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रझा अकादमीबाबत मवाळपणा दाखवत मुंबईचे सीपी बदलले. 2 मार्च 1993 रोजी जेव्हा मुंबई 12 बॉम्बस्फोटांनी हादरली होती, अशी अनेक मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचं मनसेला जशाच तसं उत्तर; मंदिरात एकीकडे महाआरती तर दुसरीकडे इफ्तार पार्टीचं आयोजन
शरद पवार म्हणाले की, ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. ती हिंदुंची ठिकाणं होती. हा स्फोट कुणी केला? त्याचा शोध मी घेतला. त्यासाठी जे साहित्य वापरलं ते मी स्वत:जाऊन बघितलं . जो पहिला बॉम्बस्फोट झाला. ते साहित्य मी पाहिलं. ते हिंदुस्थानात तयार होत नाही. ते कराचीत तयार होतं हे मला माहिती होतं. याचा अर्थ त्यामागे बाहेरची शक्ती होती. त्यामुळे कुणीतरी शेजारचा देश हिंदु-मुस्लिमांमध्ये वाद वाढवायचं काम आणि मुंबईत आग लागावी अशा प्रयत्नात होता. असंही त्यांनी म्हटलं आहे.
राऊतांचा सोमय्यांवर 100 कोटीचा नवा टॉयलेट घोटाळा; लवकरच उघड करणार: संजय राऊत
मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना 12 स्फोट झालेले असताना 13 ठिकाणी झाल्याचं मी सांगितल्याचं ते म्हणाले आहेत. मुस्लीम भागाचं नाव घेतल्याचंही सांगितलं. ते 100 टक्के खरं आहे हे मी केलं आहे. स्थानिक मुस्लिम त्यात नव्हते. परंतु मी बारावं ठिकाण मोहम्मद अली रोड सांगितल्यामुळे जातीय दंगली करण्याची ज्यांची इच्छा होती. त्या दंगली झाल्या नाहीत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच शरद पवार यांच्याबद्दल लागोपाठ 14 ट्विट केले होते. त्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर कलम 370, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, काश्मीर फाईल्स, मुंबई बॉम्बस्फोट आदी मुद्यांवरून लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट सोबत शरद पवारांची भूमिका व्यक्तव्य आणि त्यासंदर्भातील बातम्यांच्या लिंक देखील दिल्या होत्या.
Read also:
- तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊन तर दाखवा; किशोरी पेडणकरांचं रवी राणांना खुलं आव्हान
- “मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी
- मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला वसंत मोरे जाणार नाहीत? राज ठाकरे उपस्थित राहणार
- सोमय्यांचा निशाणा आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हाण्यावर! 29 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
- पेंग्विन, म्याऊ म्याऊ, कोंबडा, अन् आता म्हैस, नागाचा फणा; राज्यातील राजकारण कुठं चाललंय ?