मुंबई : महाराष्ट्रात सध्या राजकारणानं एक वेगळचं रूप धारण केलंय. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलाचं तापलं जात आहे. मात्र यामध्ये आता राजकारणाचा स्तरही घसरताना दिसतोय. कारण ज्या पद्धतीने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामध्ये एकमेकांना आता प्राण्यांच्या नावानं डिवचण्याचा प्रमाण वाढला जात आहे. हे अशोभनिय आहे. तरी देखील राजकारणी नेत्यांचा हा चिखलफेकपणा, लाजिरवाणापणा सुरू आहे.
“मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी भाजपने विधानसभेच्या पायऱ्यांवरच आंंदोलन सुरू केलं. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत जात असताना भाजप नेता नितेश राणे यांनी म्यॉऊ म्यॉउ असा आवाज काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नितेश राणेंवर निशाणा साधताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असा काहीचा फोटो असलेला ट्विट करत पैहचान कौन? असा सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून नितेश राणेंनी डुकराचा फोटो ज्याला नवाब मलिक यांचा तोंड असलेला फोटो ही जाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण? असा फोटो ट्विट करत राजकारण पेटवून दिलं होतं.
फडणवीसांचं ट्विटर वादळ शरद पवारांवर धडकलं! लागोपाठ 14 ट्विट करत घेरलं
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नेत्यांना जोरदार फटकारले. संससदीय सभ्याचार आणि शिष्टाचार हे पुस्तक सर्वांना वाचले पाहिजे , या सभागृहातमध्ये निवडुन येताना लाखों मतदार तुमच्याकडे बघून मतदान करतात, त्यातुन तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधित्व करता. कुत्री, मांजर, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. आपला माणूस तिथे जाऊन असे आवाज काढतो, टवाळी करतो यावर मतदारांना काय वाटेल. त्यामुळे सर्वांनीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. असं म्हणत अजित पवारांनी राजकीय नेत्यांना चपराक दिली होती.
“या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले”; देवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले
मात्र अलिकडेच मनसेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका करत त्यांचा चेहरा नागा सारखा दिसतोय, असं म्हटलं. त्यानंतर लगेचच जितेंद्र आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर देत माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, याचा मला अभिमान आहे, पण तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे, हा तुम्ही तपासून पाहा असं म्हटलं. त्यानंतर मनसे नेते अविनाथ जाधव यांनी आव्हांडांना प्रत्युत्तर देत आमच्या नेत्याचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतो? मग, आम्ही म्हणालो की, त्यांच्या नेत्यांचा चेहरा म्हशीच्या कोणत्या भागासारखा दिसतो तर् असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;
राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांना पेग्विंन, टरबुज, चंपा, अशी टोपण नावं सध्या दिली जात आहेत. निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर टिका करतात. परंतु त्यांची वैयक्तिक मैत्री असते. बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांना मैद्दाचं पोतं म्हणायचे. परंतु सभा संपवल्यावर विरोध मावळायचा . मैत्री कायम राहायची. परंतु आता वैयक्तिक द्वेष आणि तिरस्काराचं राजकारण सुरू आहे. सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर तरूण पीढीला बोलण्याचं भान राहिलं नाहीय. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा चांगली आहे. ते अखंडीत ठेवली पाहिजे. जो वारसा महाराष्ट्रातील जुन्या जानत्या नेत्यांनी दिला आहे. तो टिकला पाहिजे. हे आताच्या तरूण राजकारण्यांनी ध्यानात घेण्याची गरज वाटतेय.
Read also:
- राष्ट्रवादीचं मनसेला जशाच तसं उत्तर; मंदिरात एकीकडे महाआरती तर दुसरीकडे इफ्तार पार्टीचं आयोजन
- राऊतांचा सोमय्यांवर 100 कोटीचा नवा टॉयलेट घोटाळा; लवकरच उघड करणार: संजय राऊत
- आरोपींकडून खंडणी, पीडितेचा गैरफायदा, त्यांची जुनी पद्धत; राष्ट्रवादीचा चित्रा वाघ यांच्यावर धक्कादायक आरोप
- तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? फडणवीसांच्या ट्विटला आव्हाडांचा प्रत्युत्तर
- मनसेच्या अल्टिमेटलमा गृहमंत्र्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, ज्या ठिकाणी भोंगे लागतील..;