मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांबाबात इशारा दिला. येत्या 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजे नाहीतर आम्हाल जे करता येईल ते आम्ही करू, असा कडक इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील राज ठाकरे यांना इशारा दिला आहे.
“पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो. त्यामध्ये रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स वाजवू नयेत, असं म्हटले आहे. ज्या ठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत. ते काढण्याचा प्रश्नच येत नाही. न्यायालयाच्या निकालात याबाबत कोणताही उल्लेख नसल्याचंही ते म्हणाले.
भाजपच्या आमदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका
या गोष्टी कडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहेत. आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. पोलीस सज्ज असल्यामुळे कोणताही तणावाची परिस्थिती उद्धवणार नाही. अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्क केली.
“स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;
दरम्यान, राज्यात दोन ते तीन आठवड्यापासून राजकीय घडोमोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर अॅड गुणरत्ने सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तर भाजपनेते प्रवीण दरेकर यांना देखील मुंबै बॅंक प्रकरणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच आता किरीट सोमय्यांनावर देखील अटकेची टांगती तलवार आहे.
Read also:
- “मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार
- फडणवीसांचं ट्विटर वादळ शरद पवारांवर धडकलं! लागोपाठ 14 ट्विट करत घेरलं
- “या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले”; देवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले
- स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;
- “जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील”; मोहन भागवत यांनी केलं अखंड भारताविषयी वक्तव्य