मुंबई : गेल्या काही दिवसापासून मनसे विरूद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस असा राजकीय नेत्यांचा संघर्ष बघायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टिका करताना राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळे जातीयवाद वाढला असल्याचे वक्तव्य केलं आहे. तर यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी आणि मनसेच्या संघर्षात आता भाजपने उडी घेतली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या संबंधित एकामागोमाग 14 ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
“स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना कलम 370, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, काश्मीर फाईल्स, मुंबई बॉम्बस्फोट आदी मुद्यांवरून लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट सोबत शरद पवारांची भूमिका व्यक्तव्य आणि त्यासंदर्भातील बातम्यांच्या लिंक देखील दिल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र हिंदुत्व हा भाजपचा श्वास; चंद्रकांत पाटील
सुरूवातीला त्यांनी म्हटलं आहे की, एकीकडे आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत, जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. परंतु डॉ. आंबेडकरांच्या विरोधात काय बोलले जात आहे ते पहा. त्यानंतर त्यांनी द काश्मीर फाईल्ससंदर्भातील धोरण आणि राजकारणाच्या संदर्भातील राष्ट्रवादीची भूमिका सांगितली आहे.
“कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला
दाऊद इब्राहिमच्या कारवायांशी संबंधित मनी लॉण्डिंगसाठी त्यांचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी काय म्हटले होते. केवळ इशरत जहाँ यांना ‘निर्दोष’ म्हटले गेले नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आणि स्वतः त्यावेळी सत्तेत असतानाही आयबीला बदनाम करण्यापर्यंत मजल मारली. २०१२ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना मुंबईच्या मध्यभागी आझाद मैदानावर लाजिरवाणा हिंसाचार घडला होता. अमर जवान ज्योतीची विटंबना झाली पण गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रझा अकादमीबाबत मवाळपणा दाखवत मुंबईचे सीपी बदलले! 2 मार्च 1993 रोजी जेव्हा मुंबई 12 बॉम्बस्फोटांनी हादरली होती, तेव्हा शरद पवार यांनी मुस्लिम परिसरात 13वा स्फोट घडवून आणला होता. अशी अनेक मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.
Read also:
- “या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले”; देवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले
- स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;
- “जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील”; मोहन भागवत यांनी केलं अखंड भारताविषयी वक्तव्य
- “पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका
- भाजपच्या आमदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका