लातुर : स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या इमारत भुमिपुजन, सॅटेलाईट केंद्राचे उद्घाटन आणि राष्ट्रमाता जिजाऊ स्वाभिमानी योजनेचा दुसरा टप्पा शुभारंभाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत असताना त्यांनी राज्य सरकारवर कडाडून प्रहार केला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवाजीराव पाटील कव्हेकर, गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, खा. प्रताप पाटील चिखलीकर, रमेश अप्पा कराड, पाशा पटेल, अभिमन्यू पवार, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, कुलगुरू उद्धव भोसले इत्यादी उपस्थित होते.
हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र हिंदुत्व हा भाजपचा श्वास; चंद्रकांत पाटील
आत्मकेंद्रीत ऐवजी समाजकेंद्रीत पिढी घडविणे हे काम महत्त्वाचे आहे. आपल्या सरकारच्या काळात सुमारे 200 कोटींचे बिनव्याजी कर्ज महिला बचत गटांना दिले. महिला कधीच कर्ज बुडवित नाही, हाच अनुभव आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचे हक्काचे असलेले वैधानिक विकास मंडळं महाविकास सरकारने बंद करून टाकले. सार्या योजना बंद करुन टाकल्या. आता तर भारनियमन सुरू केले. जो शब्द महाराष्ट्राच्या विस्मरणात गेला होता, तो पुन्हा लादल्या गेला. असा जोरदार प्रहार त्यांनी यावेळी ठाकरे सरकारवर केला.
“कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला
विज्ञान, ज्ञान , अध्यात्म या आधारावर शिवाजीराव पाटील कव्हेकर हे शिक्षण संस्था चालवित आहेत. स्वामी विवेकानंद यांनी विज्ञान, संशोधनाचा कायम आग्रह धरला. विज्ञानाधिष्ठीत संस्थांच्या निर्मितीसाठी अनेकांना प्रेरित करण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. केवळ आर्थिक संसाधनाच्या बळावर देश प्रगती करू शकत नाही, तर त्यासाठी कुशल मानवसंसाधन हे सुद्धा आवश्यक आहे. 6 जिल्ह्यांत असे उत्तम मनुष्यबळ घडविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमांतून होते आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सदावर्तेंचा ताबा आता सातारा पोलिसांकडे! 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात साताराकडे रवाना
नवीन शैक्षणिक धोरणातून मोठी क्रांती नरेंद्र मोदी यांनी घडविली आहे. आता त्यात डिजिटल विद्यापीठाची भर पडते आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वयात शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे. या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले. ऊस कोणत्या शेतकर्याचा आहे, हे पाहून त्याला न्याय, अन्याय ठरविला जातो. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 72 फूट ‘स्टॅच्यु ऑफ नॉलेज’ पुतळ्याचे लातूर येथे लोकार्पण केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत आहेत.
Read also:
- स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;
- “जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील”; मोहन भागवत यांनी केलं अखंड भारताविषयी वक्तव्य
- “पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका
- भाजपच्या आमदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका
- “स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;