नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा गाजत आहे. हरिद्वार येथे झालेले कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखंड भारताविषयी भाष्य केलं आहे. त्यामुळे अखंड भारत हा विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावेळी त्यांनी पुढील काही वर्षात अखंड भारत तयार होणार असल्याचं वक्तव्य देखील केलं आहे.
सदावर्तेंचा ताबा आता सातारा पोलिसांकडे! 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात साताराकडे रवाना
मोहन भागवत म्हणाले की, सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र आहे. पुढील 20 ते 25 वर्षात अखंड भारत तयार होणार आहे. मात्र आपण सगळ्यांनी मिळून आणखी थोडा प्रयत्न केला तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत 10 ते 15 वर्षातच तयार होईल. हा भारत तयार करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही आणि जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
अखंड भारताविषयी आम्ही अहिंसेच्याच मार्गाने पुढे जाणार आहोत. फक्त त्यावेळी आमच्या हातात काठी असेल. आमच्या मनात कोणाविषय़ीही द्वेष नाही. शत्रुत्वाची भावना नाही. परंतु या जगाला शक्तीचीच भाषा कळते तर आम्ही तरी काय करणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
“मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर
दरम्यान, हरिद्वार येथे मोहन भागवत हे ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री 1008 स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आणि श्री गुरत्रय मंदिरांचं लोकार्पण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी अखंड भारताविषयी भाष्य केलं आहे.
Read also:
- “पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका
- भाजपच्या आमदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका
- “स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;
- हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र हिंदुत्व हा भाजपचा श्वास; चंद्रकांत पाटील
- “कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला