मुंबई : गेल्या काही दिवसापासून मनसे विरूद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस असा राजकीय नेत्यांचा संघर्ष बघायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टिका करताना राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळे जातीयवाद वाढला असल्याचे वक्तव्य केलं आहे. तर यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी आणि मनसेच्या संघर्षात आता भाजपने उडी घेतली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या संबंधित एकामागोमाग 14 ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील”; मोहन भागवत यांनी केलं अखंड भारताविषयी वक्तव्य
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जर 370 ला बाबासाहेबांचा विरोध होता तर संविधानमध्ये ते आलंच कसं ? हे मला अजूनही समजलं नाही. त्याचबरोबर जर हिंदू कोड बिलचा विरोध झाला असेल तर ते स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? त्यावेळचा जर सामाजिक, राजकिय वातावरणाचा अभ्यास केला तर पुरूष प्रधान संस्कृती ला महत्व दिलं जायचं हे समोर येईल. त्यामुळे स्त्रियांना 50 टक्के वाटा द्यावा असं त्यावेळच्या राजकीय नेत्यांना योग्य वाटलं नव्हतं. पंरतु ते योग्य असल्यांचही ते म्हणालेत.
“पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका
काश्मीर फाईल्स पेक्षा तुमचा काश्मिरी पंडितांच्या विकासमध्ये योगदान किती आहे याबद्दल सांगा. चित्रपट दाखवून काय होणार? त्याचबरोबर मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे मला माहीत नाही. 1993 ची आठवण तुम्ही काढू नका, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
भाजपच्या आमदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद इब्राहिमच्या कारवायांशी संबंधित मनी लॉण्डिंगसाठी त्यांचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी काय म्हटले होते. केवळ इशरत जहाँ यांना ‘निर्दोष’ म्हटले गेले नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आणि स्वतः त्यावेळी सत्तेत असतानाही आयबीला बदनाम करण्यापर्यंत मजल मारली. २०१२ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना मुंबईच्या मध्यभागी आझाद मैदानावर लाजिरवाणा हिंसाचार घडला होता. अमर जवान ज्योतीची विटंबना झाली पण गृहमंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रझा अकादमीबाबत मवाळपणा दाखवत मुंबईचे सीपी बदलले! 2 मार्च 1993 रोजी जेव्हा मुंबई 12 बॉम्बस्फोटांनी हादरली होती, तेव्हा शरद पवार यांनी मुस्लिम परिसरात 13वा स्फोट घडवून आणला होता. अशी अनेक मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.
Read also:
- मनसेच्या अल्टिमेटलमा गृहमंत्र्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, ज्या ठिकाणी भोंगे लागतील..;
- “मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार
- फडणवीसांचं ट्विटर वादळ शरद पवारांवर धडकलं! लागोपाठ 14 ट्विट करत घेरलं
- “या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले”; देवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले
- स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;