मुंबई : राज्यात महिलांवरील आवाज उठवणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सध्या एका वेगळ्याच प्रकरणात अडकल्या आहेत. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कर प्रकरणी पीडित मुलींनीच चित्रा वाघ यांच्यावर दवाब टाकल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडाडून टिका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या आशा मिरगे यांनी त्यांचा खुप समाचार घेतला आहे.
स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;
आशा मिरगे म्हणाल्या की, चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये प्रतिष्ठित आरोपी सापडल्यास त्यांच्याकडून खंडणी वसुल करतात. ही चित्रा वाघ ही जुनी मोडस ऑपरेंडी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. चित्रा वाघ या निवडक प्रकरणांमध्ये हात घालतात. पीडितेच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन तिला भावनिकदृष्टा ब्लॅकमेल करतात. वेळ पडली तर त्या आरोपींकडून खंडणी वसूल करतात, असा धक्कादायक आरोप देखील त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला आहे.
“जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील”; मोहन भागवत यांनी केलं अखंड भारताविषयी वक्तव्य
खंडणी वसूल केल्यानंतर त्या प्रकरणांचं काय करायचं. हा निर्णय चित्रा वाघ घेतात. फार पुर्वीपासूनच चित्रा वाघ अशाच मोडस ऑपरेंडीने काम करत आल्या आहेत. असंही त्यांनी म्हटलं आहे. संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांना मुलीने इमारतीवरून उडी मारल्याचे कसे माहिती झाले? या प्रकरणात पीडित मुलीची ओळख करायची नाही, असा नियम घालूनही चित्रा वाघ यांनी त्या मुलीचं वारंवार नाव पत्रकार परिषदेत घेतलं. या सगळ्यानंतर पीडितेचे आई-वडिल माझ्याकडे आले होते. आम्हाला न्याय हवा. परंतु आमच्या जखमांचा बाजार मांडायचा नाही, अशी भावना त्यावेळी त्यांनी व्यक्त केली होती. असंही त्या म्हणाल्या.
“पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका
दरम्यान, रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणी पीडित मुलीने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले आहेत. मला जबरदस्तीने चित्रा वाघ यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं, असं पीडित मुलीने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.
Read also:
- तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? फडणवीसांच्या ट्विटला आव्हाडांचा प्रत्युत्तर
- मनसेच्या अल्टिमेटलमा गृहमंत्र्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, ज्या ठिकाणी भोंगे लागतील..;
- “मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार
- फडणवीसांचं ट्विटर वादळ शरद पवारांवर धडकलं! लागोपाठ 14 ट्विट करत घेरलं
- “या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले”; देवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले