पुणे : मशिदीवरील भोंग्यांबाबत मनसे घेतलेली भूमिका राज्यात आता चांगलीच जोर धरू लागली आहे. उद्या पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहे. तर मनसेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
फडणवीसांचं ट्विटर वादळ शरद पवारांवर धडकलं! लागोपाठ 14 ट्विट करत घेरलं
उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या पुण्यातील खालकर चौकातल्या हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून साखळीपीर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी इफ्तार पार्टी करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या पुण्यात राजकीय वातावरण ढवळून निघाण्याची शक्यता आहे.
“या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले”; देवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले
पुण्यात वसंत मोरे यांनी भोंग्यांबाबत विरोधी भूमिका घेतल्याने त्यांनी मनसेच्या शहारध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं. वंसत मोरे यांच्या प्रभागातील 70 टक्के लोक हे मुस्लिम असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. परंतु त्यांचा हा निर्णय त्यांच्या चांगल्याच अंगलट आल्याचं दिसून आलं. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची पुण्याच्या शहाराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;
दरम्यान, मशिदीरवरील भोंगे येत्या 3 तारखेपर्यंत उतरवले नाहीत तर, त्यासमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर कायद्याच्या बाहेर गेल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असंही गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
Read also:
- राऊतांचा सोमय्यांवर 100 कोटीचा नवा टॉयलेट घोटाळा; लवकरच उघड करणार: संजय राऊत
- आरोपींकडून खंडणी, पीडितेचा गैरफायदा, त्यांची जुनी पद्धत; राष्ट्रवादीचा चित्रा वाघ यांच्यावर धक्कादायक आरोप
- तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? फडणवीसांच्या ट्विटला आव्हाडांचा प्रत्युत्तर
- मनसेच्या अल्टिमेटलमा गृहमंत्र्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, ज्या ठिकाणी भोंगे लागतील..;
- “मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार