कोल्हापुर : कोल्हापुर पोटनिवडणुकीचा आज फैसला लागणार आहे. भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडी आणि काॅंग्रेसकडून जयश्री जाधव यांची आज चुरशीची लढत होत आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीकडे लक्ष घालून होते. मात्र पहिल्या फेरीपासून जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे.
“ते 100 टक्के खरं आहे”; मुंबई बॉम्ब स्फोटांबाबत शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
दहाव्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 39,605 तर सत्यजित कदम यांना 31,512 मते मिळाली आहेत. 8073 मताची आघाडी आहे. तर 8 हजार मतानी जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांच्यावर आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पहिल्यापासून आघाडीवर आहे.
तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊन तर दाखवा; किशोरी पेडणकरांचं रवी राणांना खुलं आव्हान
नवव्या फेरीत काॅंग्रेस उमेदवार 8 हजार 959 मतांनी आघाडीवर आहेत. या फेरीत एकुण 65 हजार 942 मते मोजली असून या पैकी 36 हजार 737 मते जाधव यांना तर 27 हजार 778 कदम यांना मिळालेली आहेत. भाजप उमेदवार सत्यजित कदम हे सुरूवातीपासूनच पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. विचारेमाळ सदर बझार, ताराराणी चौक, रूईकर कॉलनी येथील मते जयश्री जाधव यांना 3635, सत्यजित कदम यांना 2431 पडले. एकुण 3976 आघाडी आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी
दरम्यान, सुरूवातीपासून जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कोल्हापुरची पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे. यावर बोलताना जयश्री जाधव म्हणाल्या की, आम्ही सुरूवातीपासून आघाडी घेतली आहे. त्यामुळे लोकांचा कल हा आता दिसून आला आहे.
Read also:
- “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी! ते मुस्लिम, तर हे हिंदू समाजाला भडकविण्याचं काम करताहेत”
- मुंबईसह विदर्भातील एकुण 35 कार्यकर्त्यांनी ठोकला मनसेला रामराम! मशिदीवरील प्रकरण मनसेला भोवलं
- आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरे यांना सल्ला !म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यापेक्षा..;
- हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला जाणार की नाहीत; वसंत मोरेंनी स्पष्ट सांगितलं
- लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा! भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ