मुंबई : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे कसबा पेठ आणि चिंचडव या विधानसभेसाठी निवडणुक आयोगाने पोटनिवडणुक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी जोरदार प्रयत्न करीत आहेत. यासाठी आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषेद घेऊन ह्या पोटनिवडणुका लढविणार असल्याचं म्हटलं आहे.
तब्बल 30 तास मतमोजणी, अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे विजयी, भाजपचा सुपडा साफ
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई उपस्थित होते. महाविकास आघाडी ही पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका लढणार असून उद्या या संदर्भात उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. तसेच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत उद्या चर्चा करून उमेदवारही घोषीत करण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
“…मग त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?” राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर
अंधेरी पोट निवडणुकीच्या वेळी समोर पराभव दिसत होता, म्हणून पळून गेलात ती नैतिकता नव्हती. लटके ताईंना दिलेला त्रास आठवतो ना? पंढरपुर, देगलूर, कोल्हापुर विधानसभा निवडणुकीच्या वेळी कुठे गेली होती नैतिकता ? असा सवाल सुरज चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजपकडून नैतिकतेचे धडे घ्यावेत एवढे वाईट दिवस महाविकास आघाडीचे आले नाहीत. असं म्हणत सुरज चव्हाण यांनी भाजपला सुनावलं आहे.
Read also
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- पवार साहेब, उद्धव ठाकरे, पटोले अन् राज ठाकरे तुम्हालाही विनंती करतो की ही निवडणुक बिनविरोध व्हावी..;” बावनकुळे
- “सुजान शिक्षकांनी भाजपला अक्षर:श लोळविले,” खुनशी राजकारण, जातीयवादी विष म्हणत राष्ट्रवादीने पुन्हा डिवचलं
- पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचं भाष्य..! म्हणाले की, “झालं गेलं गंगेला मिळालं, आता..”
- संजय राऊत अन् नारायण राणेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…