पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपसह, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसंग्राम सेना, रिपल्बिकन पार्टीचे शहाराध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची नावं वरिष्ठ पातळीवर पाठविली असून आज सांयकाळी या पोटनिवडणुकांसाठी उमेदवार घोषित केले जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तर दुसरीकडे निवडणुक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी विनंंती केली आहे.
सत्यजीत तांबेंना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत ;” नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकसाठी उमेदवारांची यादी वरती पाठवली आहे. त्यासाठी लवकरच उमेदवारांची घोषणा होणार आहे. परंतु राज्यातील शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांना विनंती करतो की, तुम्ही ही जागा दीड वर्षाकरीता लढवू नका. ही निवडणुक बिनविरोध होऊ द्या. अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा, हेमंत रासने, शंकर जगताप…
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी कसबा पेठ आणि चिंचवडमधील इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी देखील केले आहेत. तसेच येत्या 6 डिसेंबरपर्यंत पोटनिवडणुकांसाठी अर्ज सादर कऱण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या पोटनिवडणुकांसाठी येत्या दोन ते तीन दिवसात आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
तब्बल 48 तास उलटूनही मतमोजणी सुरूच, अमरवतीची निवडणुक चर्चेत, लिंगाडे आघाडीवर
दोन्ही पोटनिवडणुकांसाठी महायुतीतील सगळ्यांचं मत विचारत घेऊन उमेदवारांची नावं केंद्र पातळीवर पाठविली आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी येत्या सांयकाळपर्यंत उमेदवारांची नावं घोषित करण्यात येतील. असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. तसेच निवडणुक बिनविरोध करण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी सर्व पक्षातील प्रमुखांना एक लेखी पत्र दिलं असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
- “सुजान शिक्षकांनी भाजपला अक्षर:श लोळविले,” खुनशी राजकारण, जातीयवादी विष म्हणत राष्ट्रवादीने पुन्हा डिवचलं
- पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचं भाष्य..! म्हणाले की, “झालं गेलं गंगेला मिळालं, आता..”
- संजय राऊत अन् नारायण राणेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- तब्बल 30 तास मतमोजणी, अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे विजयी, भाजपचा सुपडा साफ
- “…मग त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?” राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर