मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी हा शरद पवार यांच्या राजकीय एक भाग असू शकतो, असं विधान काही दिवसांपुर्वी केले होते. त्यावर अजित पवार यांनी आता महत्वाचं भाष्य केलं आहे.
तब्बल 48 तास उलटूनही मतमोजणी सुरूच, अमरवतीची निवडणुक चर्चेत, लिंगाडे आघाडीवर
अजित पवारांना विचारले असता. ते म्हणाले की, त्या गोष्टीला तीन वर्षे झाली आहेत. झालं गेलं गंगेला मिळालं. आता नवी सुरूवात झाली आहे. आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी पार पडत आहोत. विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी आम्हाला चार जागा जिंकता आल्या. लोकांनी जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला कसा तडा जाणार नाही, याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सारखं भल्या सकाळी, भल्या सकाळी म्हणणे योग्य नाही. सकाळजी आठ वाजेची वेळ ही भली सकाळ नसते. आम्ही सकाळी सहा वाजता कामाला लागतो.
“संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा सत्यजित तांबेंचा नवीन परिपाठ,”
अजित पवार यांनी शिंदेंच्या बंडाळीवरही निर्णय घेतला आहे. बंडखोरीच्या सहा महिन्यांपूर्वीच माझ्या कानावर कुजबूज आली होती. त्याबाबत मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. माझ्याही कानावर ते आले आहे. मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून घेतो. आमचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्यातून मार्ग काढतो. असे अजित पवारांनी म्हटले.
Read also
- संजय राऊत अन् नारायण राणेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- तब्बल 30 तास मतमोजणी, अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे विजयी, भाजपचा सुपडा साफ
- “…मग त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?” राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- सत्यजीत तांबेंना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत ;” नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा, हेमंत रासने, शंकर जगताप…