मुंबई : राज्याच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपचा एक उमेदवार निवडून आला. पण तो त्यांनी दुसरीकडून आयात केला आहे. परंतु या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं यश पाहता भाजपवर जनता नाराज असल्याचं दिसून येत आहे. तसेच देशात तसेच राज्यात भाजपला लोकं कंटाळली आहे. त्यामुळे या कंटाळलेली लोकं येणाऱ्या काळात भाजपला नेस्ताभुत केल्याशिवाय राहणार नाही. अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
“संघर्षाच्या काळात संयम ठेऊन कसं जिंकता येतं हा सत्यजित तांबेंचा नवीन परिपाठ,”
नागपुरमधील पदवीधर मतसंघात भाजपचा पराभव झाला होता. त्याच पद्धतीने यावेळीही शिक्षकांनी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत लोकांना भाजपला नाकारलं आहे. यातच देशातल्या विविध राज्यात शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरू आहे. त्यातच तर महाराष्ट्र तर प्रगतीच्या दृष्टीने मोठं राज्य आहे. पण या राज्यात ही योजना नाही. त्याचाच फटका भाजपला बसला आहे. असंही अंबादास दानवे यांनी सांगितलं.
“नारायण राणेंना केंद्रातून लवकरच डच्चू मिळणार, केंद्रातल्या खात्यातलं त्यांना काहीच कळत नाही”
संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. नारायण राणे यांना संजय राऊत साहेबांनी योग्य रीतीने उत्तर दिलं आहे. कोणी काहीही बोलतं. सध्या त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही.
Read also
- तब्बल 30 तास मतमोजणी, अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे विजयी, भाजपचा सुपडा साफ
- “…मग त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती?” राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- सत्यजीत तांबेंना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत ;” नाना पटोलेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा, हेमंत रासने, शंकर जगताप…
- तब्बल 48 तास उलटूनही मतमोजणी सुरूच, अमरवतीची निवडणुक चर्चेत, लिंगाडे आघाडीवर