मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार वाद विवाद बघायला मिळत आहेत. यातच संजय राऊतांना मीच खासदार केले असून त्यासाठी पैसेही मीच दिल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे. त्यावर राऊतांनी नारायण राणे यांच्यावर मानहाणीचा दावा दाखल केल्याने हा वाद आणखीच चिघळला आहे. त्यावर आता शिवसेनेच खाससदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जहरी टिका केली आहे.
“दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”
नारायण राणेंसारखा वायफळ बडबड करणारा नेता आता राहिलेला नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात खातं दिलं आहे. त्यांना त्या खात्यातलं काही कळत नाही. त्यामुळे हा संभ्रमित झालेला माणुस आहे. आता केंद्र सरकारने जाहीर केलेल्या खराब कामगिरीत नारायण राणेंचा सर्वात वरचा नंबर आहे. त्यामुळे कदाचित त्यांना मंत्रिमंडळातील डच्चू मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आपलं स्थान सावरण्यासाठी नारायण राणे शिवसेनेच्या नेत्यांवर टिका करून आपलं अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न नारायण राणे करीत आहेत. अशी टिका विनायक राऊतांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
संजय राऊतांनी नारायण राणे यांना जी नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसला उत्तर देण्याची अपेक्षा नारायण राणे यांच्याकडून आम्ही करीत नाही. परंतु राऊतांनी पाठवलेल्या नोटीस नारायण राणे यांना महागात पडणार आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी 16 जानेवारीला केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर मानहाणीचा दावा ठोकला आहे. राज्यसभेत निवडून आणण्यासाठी पैसे खर्च केलेत म्हणजे नेमकं काय केलंत? माझे मतदार यादीत नाव नव्हते हे नारायण राणे यांनी सिद्ध करून दाखवावे. असं राऊतांनी म्हटलं आहे.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांबद्दल वक्तव्य केलं होतं. संजय राऊतांनी मीच खासदार केले होतं. तसेच त्यांच्यासाठी मीच पैसे दिले होते. असा दावा राणेंनी केला. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. मागील काही वर्षापासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत येताहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष्य देतांना दिसताहेत.
Read also
- सत्यजीत तांबेंचा अखेर विजय, पण मामा थोरातांनी बाळगलेले मौन चर्चेत, पुढची भूमिका स्पष्ट करणार
- अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी बाजी मारली..! दणक्यात विजय, 20 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी
- पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन, आजच्या निवडणुक निकालांचा लेखाजोखा
- “नागपुरची जागा भाजपने लढविली नाही, जर लढविली असती तर ती जिंकलीच असती”, चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी