satyjeet tambeनाशिक : राज्याच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 3 भाजपला 1 आणि 1 जागा अपक्षाला मिळवण्यात यश आलं आहे. परंतु या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेची ठरलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी विजयी गुलाल उधळला आहे. त्यांना 68,999 मत मिळालीत. ऐनवेळी काॅंग्रेसमधून फार्म न भरता अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं होतं. यातच मात्र संपुर्ण निवडणुक प्रक्रियेत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मौन बाळगल्याने चर्चांना उधान आलं आहे.
फडणवीसांच्या नागपुरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काॅंग्रेसने एबी फॉर्म दिलेला असतानाही पक्षाला टाळून अपक्ष अर्ज भरणे ही सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांची कृती राज्यात काॅंग्रेसचा धाक जवळजवळ संपुष्टात आल्याचे लक्षण असून यासंदर्भात त्यांचे मामा बाळासाहेब थोरातांनी बाळगलेले कडकडीत मौन म्हणजे तांबे पिता-पुत्रांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरित्या दिलेले समर्थनच मानले जात आहे.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसब्यातून शैलेश टिळकांनी अर्ज घेतला, पोटनिवडणुकीची रंगत वाढणार
या पार्श्वभूमीवर विजयाची घोषणा झाल्यानंतर लगेचच नवनिर्वाचित विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु यावर आता सुधीर तांबे काय निर्णय घेणार. त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. तर नाशिकमध्ये सत्यजीत तांबेचं विजयी होणार. अन् ते योग्य ते निर्णय घेणार. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
दरम्यान, थोरात आमचे कुटूंब प्रमुख आहेत. आम्ही सर्वजण एका परिवारातील आहोत. मी भाजपकडे पाठिंबा मागितलेला नाही. त्यांनी आतून दिला की नाही, हे मला माहिती नाही. कोणी न मागता ते पाठिंबा देतील असे वाटत नाही. यासंबंधी त्यांच्या ज्या नेत्यांनी वक्तव्य केली असतील त्यांनााच यासंबंधी विचारावे. असे काही असल्याचे मला मीडियाकळूनच कळत आहे. मात्र मी कोणाला संपर्क केलेला नाही आणि माझ्याशीही कोणी संपर्क केलेला नाही. असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं होतं.
Read also
- अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंनी बाजी मारली..! दणक्यात विजय, 20 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी
- पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन, आजच्या निवडणुक निकालांचा लेखाजोखा
- “नागपुरची जागा भाजपने लढविली नाही, जर लढविली असती तर ती जिंकलीच असती”, चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावतीमध्ये भाजप अन् आघाडीमध्ये काट्टे की टक्कर, फक्त 680 मतांची आघाडी
- “दया कुछ तो गडबड है..! फडणवीसांची जादू सगळीकडे चालली, पण नागपुरात का नाही?”