पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक लागली आहे. त्यासाठी अद्यापही कोणत्याही पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. परंतु यातच मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात येते का ?ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पाटील महादेवाच्या दर्शनासाठी, सत्यजीत तांबे अज्ञात स्थळी, नाशिकच्या निवडणुकीत रंगत
चिंचवड विधानसभा मतदार संघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. यातच ह्या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपकडून राजकीय पक्षांनी बिनविरोध व्हावी, यासाठी पत्रही पाठवलं आहे. त्यामुळे आता याठिकाणी भाजपकडून कुणाला उमेदवारी देणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी..! उमेदवारीसाठी आज बैठकांचा सत्र
मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याकडे आता भाजप श्रेष्ठ काय निर्णय घेतात त्याकडे आमचं लक्ष्य आहे. असं शैलश टिळक यांनी यावेळी म्हटलं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून काॅंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. परंतु महाविकास आघाडी म्हणून जे काही निर्णय घेतला जाईल, त्याला मी बांधील आहे. असं काॅंग्रेसचे इच्छुक उमेदवार रविंद्र धनगेंकर यांनी सांगितलं. तसेच ही पोटनिवडणुक भावनेच्या, हिंदुत्वाच्या मुद्यावर होणार नसून ही निवडणुक विकासाच्या मुद्यावर होईल, असंही त्यांनी सांगितलं.
नागपुरमध्ये नागो गाणार विरूद्ध सुधाकर आडबाले…! गुलाल कोण उधळणार ?
कसबा पेठ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार कुणीही असो, त्याचा निर्णय महाविकास आघाडी घेईल. त्या निर्णयाला येथील शिवसैनिक बांधील राहतील, अन् जो उमेदवार उभा राहिल, त्याला खांद्यावर घेऊन आनंद साजरा करतील. असं शिवसेनेकडून इच्छुक असणारे उमेदवार विशाल धनवडे यांनी सांगितलं. तसेच भाजपनेच मुक्ता टिळक यांच्या निधनाच्या सहानुभूतीचा विषय घालवला आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षात असं चालु असेल तर आमचं त्यांच्याविरोधात लढणं हे कामच आहे.त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. अशी खात्री राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार रविंद्र माळोदकर यांनी व्यक्त केली.
Read also
- “पदवीधर, शिक्षक निवडणुकीत नो पेन्शनं वाढवलं भाजपचं टेन्शन”, थेट मतपत्रिकांवर उल्लेख
- “कर्नाटकला पैसे दिले मग महाराष्ट्राने काय पाप केलं”, अजित पवारांचा केंद्र सरकारवर संताप
- औरंगाबादमधून विक्रम काळे आघाडीवर, भाजपला औरंगाबादमध्ये धक्का बसणार
- नागपुर, औरंगाबाद, अन् अमरावतीत भाजपला जोरदार धक्का, सगळेच उमेदवार पिछाडीवर
- विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने खातं उघडलं, विद्यमान आमदाराचा झाला पराभव