मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) यांच्यात चालू झालेला संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते आज सं. ६ वा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, आता ही भेट रद्द झाली असल्याचं सांगितलं गेलं आहे.
नाशिक-हिंगोलीत राष्ट्रवादीला भरती, विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला जाहीर पक्षप्रवेश
त्यामुळे, आता यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजभवनाकडे वेळ मागितली होती, पण वेळ दिली गेली नाही, असं म्हटलं आहे तर, दु. ४ पर्यंत राज्य सरकारकडून राजभनवाकडे कोणतीही वेळ मागण्यात आली नव्हती. दु. ४ ते सं. ६.३० पर्यंत राज्यपालांचे नियोजित कार्यक्रम होते, असं स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे, आता मुख्यमंत्री कार्यालयातून नार्वेकरांना वेळ घेण्यासाठी पाठवलं आहे, असं पटोले यांनी सांगितलं आहे.
नाशिक-हिंगोलीत राष्ट्रवादीलासांगलीच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांना हटवा! भाजपची आक्रमक मागणी
तसेच, १२ आमदारांची नियुक्ती झाल्यास भाजपत फूट पडेल अशी भीती भाजपला वाटत आहे.कारण राज्यपालांनी अनेकांना आश्वासनं दिली होती. राज्यपालांवर दबाव आहे, त्यामुळेच त्यांनी आमदारांची नियुक्ती रखडून ठेवली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री व राज्यपालांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा, असे सांगितले गेले. पण, राज्यपाल हे दिल्लीला गेले. त्यानंतर आता भेट नाकारून ते उमेदवारांवर अन्याय करत आहेत,” असा आरोप पटोलेंकडून करण्यात आला आहे.
“…तर ईट का जवाब पत्थर से देंगे,” बावनकुळेंचा शिवसेनेला इशारा
दरम्यान, स्वातंत्र्यदिनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांनी राज्यपालांना याबाबत विचारले असता, सरकारकडून आग्रह धरला जात नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आजच्या भेटीबाबत दुपारपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना माहितीच नसल्याचं देखील एकीकडे समोर आल्याने, या भेटीबाबत सरकारमधेच समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून आलं आहे.
Read Also :
- शिवसेना- भाजपच्या वादाची काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हे मजा घेत आहेत – सदाभाऊ खोत
- भावना गवळींना खावी लागणार जेलची हवा, भुजबळांनाही होणार ७ वर्षांची शिक्षा!
- एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध, राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता
- सोलापुरात वंचितला धक्का बसणार? मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर!
- राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घेईन – उदय सामंत