मुंबई : येत्या 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत. तर त्यापुढे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत दिला होता. त्यानंतर राज्यात सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकारने देखील धसका घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील बोलवून बैठक घेणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंना ‘अर्थवटराव’ म्हटल्यानंतर मनसेकडून मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, तात्या विंचू…;
पोलिस महासंचालकांनी काल राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. आगामी काळात राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी काय करता येईल. यासंदर्भात आम्ही मोठं नियोजन करीत आहोत. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांना बोलवून याबाबत बैठक घेणार आहोत. असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.
गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता! मुंबई पोलिसांचा शोध सुरू
गेल्या काही दिवसांपासून ठराविक घटकांकडून राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गृहविभाग या घडामोडींकडे अत्यंत गांभीर्याने पाहात आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका किंवा दोन समाजात तेढ निर्माण करू नका, अशी माझी सर्वांना विनंती आहे. माक्ष तरीही कोणी तसा प्रयत्न केला तर संबंधितांवर कठोर कारवाी केली जाईल असा इशारा देखील गृहमंत्र्यांनी दिला आहे.
संजय राऊतांना ‘ते’ व्यक्तव्य भोवण्याची शक्यता! न्यायालयात अवमान याचिका दाखल
दरम्यान, मागील दिवसापासून राज्यात भोंग्यांचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मनसेच्या भूमिकेला भाजपने देखील पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीत मोठा बदल घडून आला आहे.
Read also:
- “धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला..;”मनसे आमदार राजू पाटलांचा मुंडेंना टोला
- “ऑम्लिपिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली तर शिवसेना गोल्ड मेडल आणेल”
- मुंडेंकडून ‘अर्धवटराव’ तर मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाजसाहेब’ उल्लेख; राजकारण तापलं
- गुणरत्ने सदावर्तेंवर आता सोलापुरात गुन्हा दाखल! अकोला पोलीसही ताबा घेण्याच्या तयारीत?
- गुणरत्ने सदावर्तेंना अखेर जामीन मंजूर! सातारा जिल्हा न्यायालय सुनावणीत