म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत उमेदवार हे निवडणुकीसाठी घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे उमेदवार जोशुआ डिसुझा यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.
किरीट सोमय्या भाजपचा ‘आयटम गर्ल’; मंत्री नवाब मलिकांच आक्षेपार्ह वक्तव्य
कालपासून जोशुआ यांनी खोर्ली भागात प्रचार सुरु केला आहे. यावेळी जोशुआ यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाले, वार्ड क्रमांक १६ हा १९९९ पासून त्यांच्या वडिलांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला वार्ड आहे. आज देखील आम्ही प्रचार करत असताना या ठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या भागात रस्त्याची एक मागणी होती ती मागणी आम्ही पूर्ण केली आहे. तसेच या भागातील नागरिकांच्या आणखी काही छोट्या-मोठ्या समस्या होत्या त्या देखील आम्ही दूर करत आहोत.
किरीट सोमय्या भाजपचा ‘आयटम गर्ल’; मंत्री नवाब मलिकांच आक्षेपार्ह वक्तव्य
पुढे बोलताना ते म्हणाले, मतदार संघाच्या विकासासाठी तीन मोठे प्रकल्प पार पाडण्याचे आम्ही आश्वासन दिले होते त्यापैकी दोन प्रकल्पांची सुरुवात केली आहे. अडीच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही वीज,पाणी आणि रस्त्यांच्या कामांसह बरीच कामे पूर्ण केली आहेत. म्हापसा मतदार संघातील बसस्थानकाचा मुद्दा देखील मार्गी लावला जात आहे. तार नदीवरील पूल, रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पाईपलाईन बदलणे, भूमिगत विद्युतीकरण आदी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मतदार संघाच्या विकासाठी मी कटिबद्ध आहे. मी लोकांना जे हवे आहे ते करतो. मी सकारात्मक विचार घेवून माझी वाटचाल करत आहे. मला कुणाच्याही निर्देशांची गरज नाही. माजी मंत्री मायकल लोबो यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत त्यांना यावेळी विचारले असता ते म्हणाले, ज्यांना कुणाला या मतदारसंघात लुडबुड करायची असेल त्यांना करू द्या, म्हापश्याचे भवितव्य हे आमचे म्हापसेकर ठरवतील. यावेळी स्थानिक नगरसेवक विराज फडके यांनी देखील विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, एकंदरीतच आम्हाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून या निवडणुकीत जोशुआ हे एकतर्फी विजय मिळवतील असेच चित्र आहे. जोशुआ यांना पूर्ण म्हापसामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघातील लोक स्वतः पुढे येत पाठींबा देत आहेत.
Read also:
- आयोगाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला लावा अन्यथा गंभीर परिणाम; पडळकरांचा सरकारला इशारा
- पहिले तुम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव मंजूर करा; उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
- ‘लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचा योग्य वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत’
- राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती
- महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल