मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचं कारण सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केला. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आता हाच शिरस्ता काॅंग्रेसमध्ये देखील पडतांना दिसत आहेत. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना बाकीच्या पक्षातील नेत्यांना वेळ देता येतो. परंतु राहुल गांधींकडे काॅंग्रेसच्याच नेत्यांना वेळ देता येत नाही. अशी खंत काॅंग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल
राहुल गांधी हे संजय राऊतांना भेटतात पण काॅंग्रेसच्या नेत्यांना भेटत नाहीत. गेल्या २ वर्षापासून राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितली आहे, पण राहुल गांधी भेटण्यास वेळ देत नाहीत. २३ नेत्यांपैकी अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितली आहे, पण त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधींकडे वेळ नाही, मात्र इतर पक्षांच्या नेत्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ आहे. काॅंग्रेस नेत्यांची गत घर की मुर्गी दाल बराबर अशी झाली आहे. असंही आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !
महाविकास आघाडीची दुसरी संयुक्त जाहीर सभा नागपूर यथे १६ एप्रिलला होत आहे. परंतु त्याआधीच काँग्रेसमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणारे माजी आमदार अशीष देशमुख यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आशीष देशमुख हे वारंवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. सातत्याने पक्षविरोधी विधाने करणाऱ्या देशमुखांची वरिष्ठ नेते योग्य ती दखल घेतील, असे सांगून लोंढे यांनी त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
Read also
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात फूट? शिंदे गटाच्या मंत्र्याची भाजपवर टीका..
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका