मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढत असल्याने आता जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. यासाठी आता महाविकास आघाडीतील प्रत्येकी एक असे सहा सदस्यांची समिती देखील स्थापन केली जाणार आहे. यासाठी आता काॅंग्रेसने हालचाली सुरू केल्या असून या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काॅंग्रेसच्या संसदीय समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काॅंग्रेसचे अनेक बडे नेते हजर होते.
हेही वाचा…जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी, राष्ट्रवादीचं आंदोलन, फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..
नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत काॅंग्रेसने लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली आहे. या बैठकीत सगळ्या नेत्यांकडे मतदारसंघनीय याद्या देण्यात आल्या. कोणता मतदार संघ काॅंग्रेसला पोषक, कुठे बलाबल याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काॅंग्रेसला बळ प्राप्त झालं आहे. त्यामुळे काॅंग्रेस महाराष्ट्रात मोठी भरारी घेण्याच्या तयारीत दिसत आहे.
हेही वाचा…“..तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते..” शिंदे गटाच्या आमदारानी व्यक्त केली शक्यता
काॅंग्रेसच्या या समन्वय समितीमध्ये काॅंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, कोषाध्यक्ष अमरजित मनहास, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आणि महिला काॅग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संद्या सव्वालाखे यांचा समावेश आहे.
हेही वाचा…आघाडीत आता भाऊ बंदकी…! कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ, ? जागावाटपावरून संघर्ष सुरू ?
यातच आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीत अजून जागा वाटपाचा फार्म्युला ठरलेला नाही. यातच मागच्या निवडणुकीत ज्या जागा निवडून आल्या होत्या, त्या सर्व जागा शिवसेना लढविणार असल्याचं राऊतांनी सांगितलं आहे. यातच तिन्ही पक्षाला १६-१६-१६ या फार्म्युल्याचीही चर्चा होत आहे. तर सध्याच्या मेरीटनुसार जागा वाटप केल्या जातील असा काही नेत्यांचा सुर आहे. त्यामुळे आता जागा वाटप कशा पद्धतीने होतोय. ते पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बहुमत असतांनाही आघाडीत बंडखोरी, राष्ट्रवादीचा सभापती, भाजपला दणका, परभणीच्या निवडणुकीची चर्चा
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा फोन आला, पण अजित दादांचा नाही, जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, मी माझ्या…
हेही वाचा…“घोडामैदान जवळ आहे, मंत्री झालो नाही तर…” बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?
हेही वाचा…राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी..! “सगळ्यांचा फोन आला, पण अजितदादांचा फोन आला नाही,” जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…‘भावी पंतप्रधान’ म्हणून सातत्याने डिवचलं, शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले, “पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी..”